श्रावण💚 ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी काही गोष्टींचा, रंगांचा आपल्या मनावर विशेष प्रभाव असतो. जसे पावसाचे पाणी, हिरवा निसर्ग, चंद्र- चांदणे, ओल्या मातीचा सुवास, विविध सुगंधी फुलांचे गंध..कधी कधी या गंधांसोबत मनात चिटकलेली गोष्ट किंवा प्रसंग..निसर्गातील विविध रंगसंगती आपल्या मनाला कधी उत्साह देतात,उर्जा देतात तर कधी संध्याछाया भिवविती ह्रदया असाही अनुभव देतात.पण खरं सांगू हे जगणं सुसह्य होतं या रंगांमुळे निसर्गातल्या संगीतामुळे..हे रंग उमटतात निसर्गचक्रामूळे...त्याच्या अनोख्या कार्यकुशलतेने.. काही महिने असेच अनोखे..निसर्गाच्या भव्य पटलावर एक एक नक्षी अशा काही रेखाटतात की मानवी मन व त्याच्या अनुभव विश्वाला खूप सुखद अनुभव देतात..समृद्ध करतात..त्या निसर्ग सोहळ्यातून प्रसवलेली गाणी,कविता,कथा, गीत, संगित मानवी जन्माची श्रीमंती वाढवतात..हे समृद्ध जगणं परमेश्वराची कृपाच आहे.. अवखळ दरीखोऱ्यातून वाहणारे पाणी जेंव्हा अधिकच वेगवान वहाते...जेंव्हा धरतीवर ओल्या नक्षी सतत पडायला लागतात..जेंव्हा वारा आपल्याच तोऱ्यात गाणी गाऊ लागतो,जेंव्हा निसर्गा...
Comments
Post a Comment