Posts

Showing posts from November, 2022

महासत्ता

 जगातील (World) सर्वात बलाढ्य देशांची (Powerful Nations) यादी बनवायची असेल तर केवळ आर्थिक आणि लष्करी शक्तीचे प्रमाण पाहिले जात नाही. यामध्ये अनेक घटकांचा सहभाग असू शकतो. नेतृत्व, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, जागतिक स्तरावरील मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध यासारख्या घटकांचा समावेश करून या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यात पहिल्या पाचमध्ये अमेरिकेसह चीन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जग युद्धाच्या (World) छायेत असल्यामुळे आज जगातील सर्वात शक्तिशाली देश (Powerful Countries) कोणता हे जाणून घेणं महत्वाचं आहे. येथे शक्तिशाली असण्याचा आधार काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जगभरातील वर्तमानपत्रांच्या मथळ्यात राहणे पुरेसे आहे की आर्थिक शक्ती (Economic power) किंवा लष्करी शक्ती किंवा दोन्ही गरजेचं आहे. यूएस न्यूजने सर्वात शक्तिशाली देशांच्या क्रमवारीत परराष्ट्र धोरण आणि लष्करी बजेट यासारख्या अनेक घटकांचा समावेश केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील देशांवरील त्यांचा प्रभाव हाही मोठा घटक मानला गेला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्...
 एलियन्स -सौ.स्वरूपा कुलकर्णी आपल्या भोवताली असलेल्या संपूर्ण विश्वात किंवा ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतरही कुठं जीवन आहे का? असेल तर कसं असेल? हे प्रश्न आतापर्यंत शास्त्रज्ञांसाठी अत्यंत गंभीर ठरले आहेत. 1960 च्या दशकात तरुण वैज्ञानिक फ्रैंक ड्रेक यांनी म्हटलं की, एका सूर्यमालेतून दुसऱ्या सूर्यमालेत संदेश पाठवण्यासाठी महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या रेडिओ तंत्राचा वापर करता येऊ शकतो. एलियन्सही तसं करत असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना शोधण्यासाठी आपल्याला केवळ त्यांचं सिग्नल शोधायचं आहे. सेथ शोस्टॅक सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटलिजन्स (सेटी) मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आहेत. गेल्या चार दशकांपासून ते एलियन्सचे असेच सिग्नल ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. "फ्रँक यांनी वेस्ट व्हर्जिनियाच्या वेधशाळेत सध्या असलेल्या अँटिनाची दिशा जवळच्या तारांकडे केली. एलियन्स सिग्नल पाठवत असतील तर ते त्यांना कॅच करू शकतात, असा त्यांचा प्रयत्न होता. ते दोन तारांवर लक्ष ठेवून होते. मजेशीर बाब म्हणजे, एका तारेतून त्यांना काहीही संदेश किंवा सिग्नल मिळाले नाहीत. मात्र दुसऱ्या तारेतून त्यांना काही...
 महाराष्ट्र राज्य सौ.स्वरूपा कुलकर्णी "बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!”  महाराष्ट्र राज्य हे मुख्यतः मराठी लोकांचं राज्य आहे.त्यात विविध जातीधर्माची व अमराठी मंडळीही गुण्यागोविंदाने नांदत आहेत.      आपण ज्या भागात राहातो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतिची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही. उदा. आपण कोणत्याही राज्यात राहात असु तर तिथले सण, तिथले व्यवसाय, परिसर, सण समारंभ आपल्याला जवळचे वाटायला लागतात आणि जरी आपण त्या धर्माचे नसलो तरी तिथल्या संस्कृतीशी आपण इतके घट्ट बांधल्या जातो की आपल्या घरावर देखील त्या वातावरणाचा अमंल राहातोच राहातो. भारतात भरपुर राज्य अस्तित्वात आहे, साधारणतः आपल्या संस्कृतिशी मेळ खात असलेल्या राज्यांमधे राहाणे आपण पसंत करतो कारण त्या राज्यात कुठेही फिरलो तरी ते ठिकाण, तेथील माणसं आपल्याला जवळची, कुटूंबाचाच एक भाग असल्यासारखी वाटतात आणि मनुष्य हा नेहमी मानवी स्वभावाप्रमाणे सुरक्षीत वातावरणा...
 कारागिराचे यश      -सौ.स्वरूपा कुलकर्णी    राजापूर नावाच्या गावात एक केशव नावाचा लाकूडकाम करणारा कारागिर रहात होता.त्याच्या हातात दैवी कला होती.त्याने बनवलेल्या वस्तूंना खूप मागणी होती.पिढ्यान् पिढ्या त्याचे पुर्वज हीच कला पूढे नेत आले होते.केशवला एक मुलगी होती.तिचं नाव राधा!..ती लहानपणापासून केशवला लाकडाचे उत्तम शिल्प बनवतांना पहात आली होती.तीला नेहमीच तिच्या बाबांचा अभिमान वाटत असे.हळूहळू राधा मोठी झाली.तिलाही लाकडावरती कोरीवकाम करणे तसेच वस्तू बनवणे शिकावेसे वाटू लागले. एक दिवस ती केशवला म्हणाली, "बाबा, मलाही ही कला शिकवा नं..किती सफाईने तुम्ही इतक्या सुंदर वस्तू बनवता". त्यावर केशव म्हणाला,"राधा,आत्ता नाही.तू आधी उच्च शिक्षण घे.मगच या गोष्टीचा विचार करू."    राधा नाखूशीने तयार झाली.पुढे ती मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शहरात गेली.४ वर्षाच्या कोर्ससाठी ती होस्टेलवर रहाणार होती.पहिल्या वर्षी सुट्ट्यांमध्ये ती गावी आली.बाबा व तिथले कारागिर चर्चा करत बसले होते.तीने सहज चर्चा ऐकली.    केशव- " अरे असं खचून कसं चालेल.हेही दिवस जातील....
 स्वप्नातली परी -सौ.स्वरूपा कुलकर्णी ती सुंदर परी भेटली अवचित माझ्या घरी आली, अवघडलेली किंचीत भोळी मला भेटण्या उभी लाजरी किती मुलायम तिची काया सुंदर लोभस चेहरा कोवळा, साडीचा पदर घेऊन हाती हळूच लाजली पाहून मजसी एरवी बोलका माझा स्वभाव तो परंतू झाला अबोल शांत हा, कसे वदावे गुपित मनीचे ती संकोचून पाहे मजला आता अचानक झालो वाघ मी गेलो सामोरी तिच्या इतुका घेतले हात माझ्या हाती जवळ ओढिले नकळत तिजला चुंबन घ्याया अधिरे मन हे परंतू नव्हते कोणीच तेथे क्षणात भंगले गोड स्वप्न हे जाहलो आम्ही क्षणात वेगळे हाय!कशी ती जवळी घेतली माझी मलाच लाज वाटली, दुलई माझी अजुनी भासते स्वप्नात पाहिलेली गोड परी ती!!
ही गुलाबी हवा सौ.स्वरूपा कुलकर्णी ही गुलाबी हवा मला सांगते गूज नवे नवे, तुझिया माझिया प्रितीचे  भावदर्पण अलवार ते गारवारा तो भरारा वेढला पानाफुलांभोवती, मी सहज गुंफले हात तुझ्या हातात ते स्वर्ग दोन बोट उरला जाहला श्वास वेगवान तो, मी अनावर जाहलो तुला पाहूनी जवळी हे स्पर्श तुझ्या थंड बोटांचा विझवी तप्त अग्नी तो, जो माझिया ह्रदयात पेटला सुप्त अनावर प्रखर तो मी पाहतो तुला साथी जन्मोजन्मीचा, न राहू शकेल तुजवीण मी प्रेमी युगायुगांचा भेट ही गुलाबी साजिरी मन ही दाटले भावनांनी ते, किती जीवा सुखावतो ऋतू  हा प्रेमीयुगूलांचा

अनोळखी प्रिती

 अनोळखी प्रिती -सौ.स्वरूपा कुलकर्णी अनोळखी या वाटेवरती फुले उमलली सहज सुगंधी, सहवासाचे ऋतू कोवळे अलगत आले तारूण्यात हे मी संकोचून पहिल्यांदा प्रश्न विचारी जगावेगळे, तोही हसूनच बोलत राही उत्तर देई अवखळ मज ते कशी मी गुंतले त्याच्याभोवती नकळे भान सुटले अवघे, भूत भविष्य सारे विसरून समीप आलो प्रेमऋतुते.. कसे कधी न काही कळले एव्हडे अंतर क्षणात सरले, तुम्ही तुम्ही करता करता तू तूझी मी बनले सख्या रे सावध होते इतुके साल मी विसरले माझे सुर वेगळे आता आळवते सूर मखमली तुझी नी माझी प्रित नवीनवी...
खेळ सौ.स्वरूपा कुलकर्णी सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की असे कितीतरी खेळ आठवतात. काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे. हे खेळ जिथे खेळले जायचे तिथल्या समाजाचा, परिसराचा इतिहास त्या त्या खेळात आपण पाहू शकतो. हे खेळ त्या त्या गावच्या संस्कृतीचे आणि तिथल्या रूढी-परंपरांचे प्रतिकं आहेत. सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता, गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती. अख्ख्या महाराष्ट्रात मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं. अख्खी रात्र खेळ खेळण्यात जागवली जायची. काही खेळ तर प्राण्यांशी संबधित आहेत. जसे सांगली जिल्ह्यातील समडोली गावात कबूतर पालन हा एक पारंपारिक खेळ आहे. भातुकलीचा खेळ तर प्रत्...
मुलांचे विश्व सौ.स्वरूपा कुलकर्णी                बच्चे मन के सच्चे...।     हे गीत आपल्या सर्वांच्या आवडीचं..किती सुंदर ओळी आहेत ह्या..लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत.सगळं खरं सांगतात.बऱ्याचदा मोठ्यांचीही खरं बोलून  फजिती करतात.त्यांचं सुंदर विश्व जर समजावून घेतलं तर खऱ्या अर्थाने रोजच बालदिन साजरा होईल.      लहान मुल जन्माला यायच्या आधी आईच्या पोटात असतं.नऊ महिन्यांच्या त्या जडणघडणीच्या काळात ते दिवसागणीक बदलत असतं.त्याचं निश्चित रंग,रूप,आकार हे ठरायचं असतं.त्याला आई-वडिलांकडून मिळालेले जनुके त्याचे पुढचे व्यक्तिमत्व कसे असेल हे ठरवत असतात.Inheritence हा शब्द आपण वापरतो.ही निसर्गाची प्रजनन क्रिया पार पाडल्यानंतर आई बाळाला जन्म देते.किती निरागस डोळ्यांचं, निष्पाप पिल्लू ती माता या जगात आणते.नैसर्गिक असो अथवा सीझर पद्धतीने ते बाळ अनेक संघर्ष करतच जन्मलेलं असतं.या जगात आल्यानंतर त्याला त्याचं नाव, गाव, ओळख असं काही बोलता सांगता येत नाही.पण ते आपल्या जन्मदात्रीला -आईला ओळखतं.तीने सहन केलेले ते दिवस जणू बाळही विसरलेलं नसतं....
‘आज शिवाजीराजे असते तर....!!   - सौ.स्वरूपा कुलकर्णी      सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते, तेव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तींची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातली अंदाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येतो, ‘आज शिवाजीराजे असते तर……!’ शिवाजीराजांना राजकारणातील डावपेच उपजतच लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून, उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा व कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले. आज शिवाजीराजे असते तर पाकिस्तान, चीन अफगानिस्तान या शत्रूंची वारंवार डोके वर काढण्याची हिम्मत झाली नसती. शिवाजीराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले. पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. हे प्रजेचे राज्य आहे, ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडवले होते. राजे राजे हित दक्ष होते. राजांना अन्याची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी ...
मोबाईल नसते तर... सौ.स्वरूपा कुलकर्णी      आजचे आधुनिक युग मोबाईल व संगणकाचे युग आहे. आजचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे. मनुष्याने लावलेल्या शोधांमध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आजकाल दिवसाची सुरुवात मोबाईलनेच होते. व्यवसाय नातेवाईक व मित्र मंडळी शी संपर्क करण्यासाठी मोबाईल चा वापर केला जातो. तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर मोबाईल नसता तर...?  आज जर मोबाईल नसता तर आजचे हे युग आधुनिक युग म्हटले गेले नसते. कारण आजच्या आधुनिक युगाला परिवर्तित करण्यासाठी मोबाईल ची भूमिका महत्त्वाची आहे. विकासाच्या मार्गावर आज सर्वच वस्तू डिजिटल झाल्या आहेत. मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले नसते. कारण मोबाईलच्या च मदतीने पैश्यांची देवाण घेवाण होते. मोबाईल नसता तर नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक लोकांना संपर्क करणे शक्य झाले नसते.  आजकाल प्रत्येक वस्तू स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. जगभराची माहिती घरबसल्या मोबाईल मुळे मिळवणे शक्य होते. परंतु जर मोबाईल नसता तर जगात काय काय नवीन घडत आहे हे लक्षात आले नसते. ऑनलाईन शॉपिं...
शीर्षक - " हसा मुलांनो हसा " रचना-  सौ.स्वरूपा कुलकर्णी " हसा मुलांनो हसा " निळे सावळे माड अलिकडे आकाशाचे रंग पलिकडे, चला मुलांनो हीच वेळ ती नाचू गाऊ गीत नवे नवे रंग बावरे पक्षी गाती हसरी फुले, मोर नाचती छुनछुन छुन छुन पाऊल पडते हसरे बालक नाचू लागते संध्येच्या या सदनी बागडू फुलपाखरांना पाहूनी खिदळू सोनसाखळीची गोष्टही सांगू उंच उंच ते पक्षी पाहू किती किती उंच हा डोंगर लांबच नदी छोटे ओढे मस्त झोपू कुरणावर त्या नको अभ्यास नको काही अशी ही दुनिया मस्त मजेची चला सफर करू आनंदाची हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा...😃
एक पैशाची कथा सौ.स्वरूपा कुलकर्णी     मध्यरात्र उलटून गेली.गडाचे दरवाजे बंद झाले.किल्लेदार जनार्दस्वामी गडाच्या टेहळणीसाठी गडावर पहाणी करू लागले.त्यांना सर्वत्र सामसूम अढळली.फक्त एका खोलीत मिणमिण प्रकाश दिसला.स्वामी तिकडे वळले.ते तिथे येताच..          " सापडली, चूक सापडली" स्वामींचा शिष्य आनंदात नाचू लागला.      स्वामी खोलीत आले.तो वरमला.आपले गुरूजी समोर पाहून शांत झाला.    स्वामी म्हणाले," बाळा, एव्हड्या मध्यरात्री हिशेबाची चोपडी घेऊन तू काय करतोयस?"  बाळ म्हणाला,"महाराज,तुम्हीच शिकवलंय चूक सापडेपर्यंत प्रयत्न करायचा. ही चूक सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतो.हिशेबात एक पैशाची चूक राहीली होती.ती सापडली.म्हणून जागा होतो."        जनार्दनस्वामींनी शिष्याला पोटाशी कवटाळले.त्या पोरसवदा लेकराला आशिर्वाद देत म्हणाले," नाथा, धन्य तुझी कामातील प्रामाणिकपणा व गुरूनिष्ठा...एक दिवस तू खूप मोठा होशिल व गुरूंचही नाव मोठं करशील".      मंडळी, ते पोरसवदा लेकरू म्हणजेच संतश्रेष्ठ एकनाथ महाराज!..नाथांनी लहान...
प्रवासवर्णन -सौ.स्वरूपा कुलकर्णी       मला लहानपणापासूनच प्रवास करायची खूप आवड आहे.प्रवासात केलेली गम्मत जम्मत तसेच अनुभवाला येणारी मनोरंजक घटना मनात घर करून जाते.जग किती सुंदर आहे ते उघड्या डोळ्यांनी पहावं असं माझं मत आहे.सुंदर सुंदर माणसं त्यांचे संवादकौशल्य, वेगळ्या राज्यातील वेगळ्या भाषा, ती ऐकून वाटणारी मजा लहान मुलासारखी एखाद्या परडीत जमा केलेल्या फुलासारखी जमा करावीत.तीच परडी आयुष्यभर जपावी.त्या फुलांचा सुगंध दीर्घ काळ पर्यंत टिकतो.नाश पावत नाही.         मी कॉलेजला असतांना हैद्राबाद,तिरूपती असा प्रवास करण्याची सुसंधी चालून आली.मी तर आनंदाने फुलून गेले होते.ती सहल आयोजित केली होती माझ्या आजोबांनी(आईच्या वडिलांनी),त्यांचा औरंगाबादमध्ये ज्येष्ठ मंडळींचा हास्य क्लब होता.ही सहल चौधरी यात्रा कंपनीकडे सोपवली होती.मी , माझी मावशी, आज्जी-आजोबा व इतर ज्येष्ठ व काही तरूण मंडळी या सहलीसाठी एकत्र जमली.आमचा प्रवास औरंगाबाद-हैद्राबाद-तिरूपती असा असणार होता.ट्रॅव्हल्सची बस असल्याने व सोबतची मंडळी अतिशय उत्साही असल्याने गाणी म्हणत,भेंड्या खेळत आमचा प्रवास सुरू झ...
जादूचा चष्मा सौ.स्वरूपा कुलकर्णी       श्रीरामपूर नावाचं एक गाव होतं.त्या गावात एक तुकाराम नावाचा शेतकरी राहायचा.त्याला २ मुले व पत्नी असे कुटूंबं होतं.तो अतिशय मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून गावात प्रसिद्ध होता.त्याची गावाबाहेर ५ एकर शेती होती.तो दिवसभर मेहनत करून नांगरणी,खूरपणी, बी पेरणी अशी कष्टाची कामे  करत असे.       एक दिवस नांगरणी करत असतांना त्याच्या नांगराच्या फाळाला एक कठिण वस्तू लागली.तुकाराम आश्चर्यचकित झाला. मनात म्हणाला ,' अरेच्चा,एव्हड्या दिवसांत तर कधी माझा नांगर कधिही थांबला नाही.आज इथेच का रूतला?' त्याने नांगर जेथे रूतला तेथे खूप वेळ कुदळ मारून जागा उकरली.त्याला तिथे एक जुनी बंद पेटी सापडली.तुकारामचे डोळे चमकले. 'अरे , पुर्वजांचे काही गुप्तधन तर यात नाही?'  त्याने उत्सुकतेने पेटी उघडली.पण 'हाय रे दैव' त्याचा भ्रमनिरास झाला.कारण त्या पेटीत एक जुना चष्मा होता.त्या वाईट वाटले.नशीबाला दोष देत त्याने तो चष्मा आपल्या कनवटीला बांधला व पुढिल कामाला लागला.थोड्या वेळाने त्याचा मुलगा सुरज तेथे आला.त्याने तुकारामसाठी जेवणाचा डबा आणला होता. त...
 कुटूंब सौ.स्वरूपा कुलकर्णी            कुटूंब ही समाजव्यावस्थेची पहिली पायरी आहे. अनेक कुटूंबाचा समुह म्हणजेच गाव.ही पहिली पायरी व्यक्तीच्या मानसिक,शारिरीक,भौतिक गरजांसाठी अत्यंत महत्वाची आहे.कुटूंबाद्वारेच संस्कृतीचे रक्षण व पोषण होते.समाजहीत जपल् जाते.जबाबदार कुटूंबं ही राष्ट्राची खरी संपत्ती होय.कुटूंबातील प्रमुख व्यक्ती ही कुटूंबाचं मार्गदर्शन करते. भारतीय कुटूंबव्यावस्था ही एक आदर्श कुटूंबव्यावस्था आहे.आजी-आजोबा ही बुजूर्ग मंडळी, तसेच आई-बाबा ही पालक मंडळी, त्यांची अपत्ये ही तिसरी पिढी.पुर्वी भारतात कुटूंब ही मोठी होती.अनेक नातेवाईक एकत्र रहायचे.सख्खी-चुलत, नातवंड-पतवंडं एकत्र रहायची.त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असे.आता कालमानानुसार कुटूंबं छोटी झाली.नोकरी-व्यवसायामूळे लोकं परदेशात गेली.बदलत्या जीवनशैलीनुसार जगणं ही स्पर्धा झाली.नात्यातील वीण ढिली झाली.पुर्वीचा आदर नात्यात न राहिल्याने कुटूंबं लहान होत गेली.    आज आपण पहातो की कित्येक घरे घटस्फोटाने किंवा अकस्मात मृत्यूमुळे ढासळत गेली.नाती सांभाळण्यापेक्षा ती तुटण्यातच काळ बांधिल झाला.ह...
   "आई, मी येतिये गं पाडव्याला.." इति मी.  "हो हो ,आम्ही वाटंच पहातोय..सगळे या.." तिकडून आई फोनवर बोलत होती.. माहेरी जायला मिळणार म्हणून माझा आनंद नुसता ओसंडून वहात होता..बच्चेकंपनी तर नाचूच लागली..एकूणच काय सगळं वातावरण खूश्श!! दिवाळीतले हे संवाद सर्वत्र ऐकायला मिळतातच..कारण ही पर्वणी दर वर्षात एकदाच येणारी पण वर्षभर आठवणीत रहाणारी.. दिवाळीचा आनंद माहेरी जायला मिळणार म्हणून वाढलेला असतो😀तसं पाहिलं तर दिवाळी चा आनंद १ महिना आधिच दिवाळी येणार म्हणून जाणवत असतो..कसा नि किती ते सांगता मात्र येत नाही..सुख सुख म्हणतात ते काय असतं ते दिवाळीतच कळते...एक स्त्री म्हणून नविन साडी घेण्यातलं सुख..पिल्लांना नविन कपडे आणन्यातलं सुख..नवऱ्याला दिवाळी गिफ्ट मागण्यातलं सुख..दिवाळी येणार म्हणून सगळं घर आवरण्यातलं व नंतर निवांत चहा घेण्यातलं सुख.. फराळाच्या नवनविन रेसिपी बनवून सगळ्यांची वाहवा मिळवण्यातलं सुख...ही यादी न संपणारी...😍..    लक्ष्मीपुजनाला उजळणाऱ्या लक्ष लक्ष दिव्यांना पाहून हसणारी दिवाळी मनात चांदणं गोंदणं करते ..जणू सुखांच्या राशी लक्ष्मी भरभरून देत असते.आ...
माझा देश सौ.स्वरूपा कुलकर्णी    जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपी गिरीयसी।    ह्याचा अर्थ माझी मातृभूमी स्वर्गाहूनही मला जास्त प्रिय आहे.प्रभू रामचंद्रांच्या तोंडी हे वाक्य रामायणात आलं होतं.हे किती थोर विचार आहेत हे सांगायलाच नको.कारण मातृभूमीचा सुपूत्र म्हणून जेंव्हा जगभर गौरव होतो तेंव्हाच कळतं की अभिमानाने वक्ष किती फुलून येतो.माझा देश- भारत देश हे सांगतांना कितीतरी अब्द अब्द मनात दाटून येतं.माझे अस्तित्व ज्या भूमीने निर्माण केले तिला वंदन केल्याशिवाय होत नाही.वंदे मातरम् हे गीत ऐकतांना अंगावर शहारे येतात.ए.आर.रहमानने ते किती ह्रदयातुन गायलंय! शत्रूचा फडशा पाडत असतांना अंगावर आलेली गोळी झेलून वीर जवान जेंव्हा त्याही स्थितीत 'वंदे मातरम्' म्हणतो तेंव्हा मातृभूमीसाठी चाललेल्या यज्ञात एक आहूती अर्पण होते.स्वातंत्र्ययज्ञात ७५ वर्षांपुर्वीही असेच अनेक वीर योद्धे लढता लढता मृत्युमुखी पडले.पण त्यांच्या अपार कष्टातून स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच.ही भूमी शत्रूंच्या जाळ्यातून मुक्त झाली.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत भूमी स्वतंत्र झाली.परत एकदा मुक्तीचे वारे वाहू लागले.प्रत्येक भारतीय नाग...
 चित्रपट -सौ.स्वरूपा कुलकर्णी       चित्रपट हे एक दृकश्राव्य माध्यम आहे.यातून  एकाचवेळी डोळे व कान तृप्त होतात.माणसाच्या भावभावनांना मिळालेला सुंदर प्लॅटफॉर्म म्हणजे  चित्रपट.पुर्वी लोक चित्रपट पडद्यावर पहायचे..पण जसा काळ बदलला चित्रपट सिनेमागृहात बघितली जाऊ लागली.त्यातही बदल होऊन ती डिजीटल युगाकडे सरकली.आज OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्या मोबाईलवर नवनविन चित्रपट पहायला मिळतात.ही खरी डिजीटल क्रांतीच आहे.चित्रपटांचा हा मनोवेधक प्रवास अतिशय रंजक आहे.आज आपण टिव्हीमुळे जुने चित्रपट पाहू शकतो.         चित्रपट हे एक तंत्र आहे.या तंत्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर,तरल,भयावह,सजिव चित्रकथा सादर केल्या जातात.त्याला संगिताची अप्रतिम जोड देऊन चित्रपट अधिक भारदस्त बनतो.त्यातून माणसाच्या जीवनाला जवळून स्पर्श होतो.चित्रपटांमुळे सहज सुंदर कलाविष्कार सादर केले जातात.लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात.काही चित्रपट लहानांसाठी असतात तर काही फक्त मोठ्यांसाठी.चित्रपटात काही विषय मोठ्याप्रमाणावर चोखाळलेले आहेत.प्रेम, स्त्री, नाती,ईश्वर, भक्ती...
 सण सौ. स्वरूपा कुलकर्णी भारतात कोणताही सण मग तो दिवाळी असो की दसरा, मकर संक्रांत असो की होळी तसेच ईद असो की ख्रिसमस सगळ्या सणांचा उद्देश हा परस्परांतील सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढावी हा असतो.या सणांमुळे समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी खूप मदत होते.मानवी मन हे मुळातच उत्सवप्रिय असतं त्यामुळे असे सण उत्सव समाजात आनंद,उत्साह आणतात.त्यातुन नवनवीन कलांना प्रोत्साहन मिळते.ईश्वराप्रती आदरभाव वाढीस लागतो.        सण ही संकल्पनाच मुळात घरातील,गावातील व पर्यायाने राष्ट्रातील संस्कृती संवर्धनासाठी उपयोगाची ठरतात.सणवारातील रूढी व परंपरा नात्यातील गोडवा अखंडपणे जोडून ठेवतात.     हिंदूंच्या काही प्रमुख सणांची माहीती घेऊया.हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा नविन वर्षाचा पहिला सण असतो.त्यादिवशी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यामागे पुराणातील कथा प्रसिद्ध आहेत.प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले तो दिवस गुढिपाडव्याचा दिवस मानला जातो.वर्षभरात हिंदूंमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात.दसरा हा सण प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणून साजरा केला...
 पुस्तक     मानवी इतिहासातील अतिशय महत्वाचा शोध म्हणजे पुस्तक छपाईचा शोध! माणसाने त्याला माहित असलेल्या ज्ञानविज्ञानाच्या आधारे अनेक शोध लावले.परंतू पुस्तक छपाईने एक वेगळीच क्रांती साधली.मानवाच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा या पुस्तकाने घेतलाय.माणसाला ज्ञात असलेल्या गोष्टी त्याने पुस्तकात छापायला सुरूवात केली.त्यातून प्रत्येकाला ते ज्ञान संक्रमित करता येऊ शकले.यातून विचारांची देवाणघेवाण शक्य झाली.जगणं रंजक बनलं.पुस्तकांनी मुलांचे शालेय जीवन बहुरंगी बनले.ती त्यांची ज्ञानशिदोरी बनली.लेखकांची प्रतिभा पुस्तकातून बहरू लागली.नवनवीन सर्जक कला त्यातून उभारी घेऊ लागल्या.कविंच्या कविता फेर धरू लागल्या.विज्ञानातील शोध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.जग एकमेकांशी 'जोडले' गेले.पुस्तके विचारमंथनाचे काम करू लागली.चिंतनशील माणसाला पुस्तकांचा फार मोठा लाभ झाला आणि होतोय.सांस्कृतिक देवघेवीत पुस्तकांचा वाटा मोठाय.पुस्तकातील अपरिमीत माहितीचा खजिना मानवी आयुष्यातिल प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकतात.एकूणच माणसाचे आयुष्य सुकर झाले.तसेच अधिक कार्यक्षम झाले.        पुस्तके जितकी आपली मै...