ऋतुरंग - सौ. स्वरूपा कुलकर्णी ऋतु बदलला म्हणजे रोज दिसणारी झाडांची, फुलांची, हवामानातील बदलाची जाणीव आपल्याला होते. हे ऋतुरंग मला जणू नववधुने गृहप्रवेश करतांना तीच्या बदलणाऱ्या आयुष्यासारखे सुंदर वाटतात. सुंदर सकाळ अजुनच सुंदर होते.आता हेच बघा ना,सद्ध्या ऋतु बदलतोय हे आपल्याला जाणवतंय. हिवाळा जाऊन उन्हाळ्याकडे झपाट्याने प्रवास होतोय. शिशिर सरून वसंताचे आगमन झाले आहे.निसर्गातील हा बदल विलक्षण देखणा व सुगंधी आहे , कसा ते बघा हं..विविध झाडांच्या हिरव्या पानांतुन आता कोवळ्या पोपटी पानांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केलिये.आंब्याच्या हिरव्या- पोपटी पानांत आता मोहर लगडलाय.आता आंब्याच्या प्रतिक्षेत सर्वजण मोहोर व बाळकैऱ्यांकडे आठवणीने मधुन मधुन लक्ष ठेऊन आहेत. कैऱ्यांची चटणी,तक्कू, लोणची हळूहळू घराघरात दिसू लागलीये. छोट्या बागेतील झाडांवर उन्हामुळे विसावलेले विविध रंगांचे-जातीचे पक्षी दिसत आहेत. नळाजवळ, पाणवठ्याजवळ पक्षी घुटमळत आहेत. तहानलेल्यांसाठी गच्चीवर, गॅलरीत पाण्याच्या छोट्या वाट्याही ठेवल्या जाताहेत. पहाटेच कळ्या उमलून जणू ह्या चांदण्याच वाटाव्यात अशा मोगऱ्याचा ...
Posts
Showing posts from April, 2025
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार🙏 माझं नाव आनंदी.. डॉ. आनंदी गोपाळराव जोशी आज तुम्हाला माझी छोटी जीवनगाथा सांगणार आहे.माझा जन्म ३१ मार्च १८६५चा. मी माहेरची यमुना. गणपतराव जोशींची ज्येष्ठ कन्या. वयाच्या ९ व्या वर्षी माझा विवाह माझ्याहूनही वयाने २० वर्ष मोठ्या बीजवराशी गोपाळराव जोशींची झाला.गोपाळराव हे मुळ नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे.लग्नानंतर माझे नाव यमुना बदलून आनंदी ठेवले गेले.लग्न झाल्यापासूनच गोपाळराव मला अभ्यास करायसाठी मागे लागत. कविता , धडे पाठ करायला सांगत. ती नाही केली तर मारहाणदेखील करत.त्या काळी मुलीने स्वयंपाक केला नाही तर तीला नवरा मारहाण करी पण माझ्या नशीबी वेगळाच प्रकार लिहिला होता.अभ्यास नाही केला म्हणून मी मार खाल्ला.वयाच्या १४ व्या वर्षी मला मुलगा झाला. पण वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तो वारला. मी दुःखी झाले.ही मात्र माझ्या आयुष्यातली महत्वाची घटना. या घटनेनंतर मी डॉक्टर व्हायचे ठरवले.ह्यांनी लोकहितवादींची शतपत्रे वाचली होती. त्यांचे विचार पुरोगामी होते. स्त्रीयांनीही इंग्रजी , संस्कृत शिकावं या विचारांचे ते होते. माझी अभ्यासातली गती पाहून ह्यांनी माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत प...
- Get link
- X
- Other Apps
चैत्रगौरीस पत्र - सौ. स्वरूपा कुलकर्णी प्रिय गौरी, तुझ्या शुभागमनाने मन परत आनंदाने बहरून गेले. तुझी पावले माझ्या अंगणातुन घरात उमटली नी मन खरंच टवटवित झाले.सळसळतं चैतन्य घरादाराला आले. किती प्रतिक्षा तुझ्या आगमनाची! ही अवस्था तर दरवर्षीचीच गं.त्या कैलासाधिपती शंकरांना सोडून माहेरी मनसोक्त विश्राम करायला येतेस.माझ्या संसाराला काय हवं काय नको ते पहायला तू येतेस. हिरवी साडी, ठसठशीत कुंकू, लांब वेणी, कमनीय बांधा, नाजूक हात, सुंदर पावले अशी तू सोळा श्रृंगार करणारी गौराई माझ्या घरी विश्रांतीसाठी येतेस.आल्या आल्या सुगंधी तेल लावून,उटणे लावून अभ्यंग स्नान करतेस.त्या तूला स्नान घालतांनाचे तुझे माझे संवाद कितीतरी वेळ चालतात.माझ्या मनोराज्यात तूझे स्वागत होते. तू गोड खिरापत, दुध-साखरेचा नैवेद्य भक्षण करतेस.मी मनोभावे केलेली आरती तू हसतमुखाने स्विकारतेस.गार माठातलं,सुगंधी वाळ्याचं पाणी पितेस, कच्ची कैरी चवीने खातेस, मोगऱ्याचा गजरा केसात माळतेस, सुगंधी अत्तर हौशेने लावतेस. मधुनच घरातल्या पिल्...