Posts

Showing posts from August, 2022

पहिली परी

  ✍🏻लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी          लग्न होऊन दोन वर्ष झाली.सईच्या सासूबाईंना अजुन पाळणा कसा हलला नाही याची काळजी वाटू लागली.सई व समीर दोघेही निर्धास्त.आत्ताच तर लग्न झालंय बघू पूढे.पण घरात मात्र सासू सासरे काळजीत.विमलबाई तशा मोकळेपणाने तिच्याशी बोलत नव्हत्या पण विनायकरावांला याविषयी काळजी बोलून दाखवत होत्या." अहो, समीरचं लग्न होऊन ५वर्ष झाली.अजुन पाळणा हलला नाही.दोघांचे वयही तिशीच्य् पुढे.काळजी वाटतो हो.." यावर विनायकबुवा मात्र हसून गोष्ट दुर्लक्षित करत होते."अगं एव्हडी काय काळजी करतेस.होईल सगळं वेळेवर.नको एव्हडा विचार करूस". विमलबाई मात्र तोपर्यंत हातात माळ घेतलेली असे.त्यांचं देवाला साकडं घालणं चालूच होतं.मन काही थार्यावर नव्हतं. सई व समिरचे कायम एकमेकांशी खटके उडायचे.समिरने सईला तिच्या पुर्वआयुष्यासगट स्विकारलेलं होतं.पण ती मात्र कायम निराशेच्या गर्तेत जात राहीली.प्रेम ही गोष्ट नात्याचा श्वास असतो हे ती विसरली.त्यामुळे घरात कायम वितंडवाद होत राहिले.हे सगळं बघून विमलबाई विलक्षण चिंताक्रांत होत्या.         दिवस चालले होते आणि अचा...
विषय-  फुललेला बगीचा कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी आज माझ्या बागेत उमललय कोण? हळूच जाऊन बघते तर दिसतंय कोण.. गुलाबी गुलाब प्रेमाचे प्रतिक, डौल त्याचा वर्णावा कसा नी किती? कोपर्यात उमलली जास्वंदीची फुले, लाल फुलांचा हार गणपतीसा शोभे अबोली फुलांचा रंग मोठा खास, सुंदर आकार नी डौलदार पाकळ्यांचा साज भरीव गोल सुवासिक शेवंती पांढरी शुभ्र, बहरते एव्हडी की झूकते होऊन नम्र जो तो ह्या सोनचाफ्याचा दिवाणा, हातात घेऊन सुगंध घ्यावा वाटे सर्वांना सुगंधी नाजूक पांढरीशुभ्र जाई नी जुई, हिला पाहून मन कसे हरखून जाई नाजूक दिसे परी याचा आहे मान, सुगंधी दरवळ उठतो हा पारिजातक छान लाल पिवळ्या फुलांचा झाला याला भार, वसंत ऋतूत बहरतो गुलमोहर फार जन्माष्टमी कृष्णाची अन् फुल दिसे वेलीला, सुंदरसेहे कृष्णकमळ उमलले दिमतीला लाल सुंदर कमळ देवी लक्ष्मीचे आसन, विष्णू देवाच्या हाती शोभे याच् स्थान उज्वल बारामासी सदाबहार झाड याचे डवरलेेले, छत्रीसारखे पांढरे फुल चोहिकडे बहरले बोगनवेल लाडकी आहे सार्या जगाची, हिच्या असण्याने शोभा वाढते जागेची अशा या सुंदर फुलांच्या सुंदर सुंदर कथा, मी झाले मंत्रमुग्ध सहवासाने त्यांच्या
  'या सुखांनो या' -सौ.स्वरूपा कुलकर्णी  झोप काळोखी अंधाराची नाही कवडसा सौख्याचा, मन विषण्ण तगमगणारे नाही शांती एव्हडीशी... जग माझे उदास उदास नाही त्यात किरण आशेचा मी वाट पहातो उद्याची कधी दिसे सुर्य सुखाचा.. मी कवटाळले सारे दुःख माझे जरतारी व्यथा वेदना जहरी तरी आशा  वाटे अनोळखी... शांत आकाश हे सारे आली झुळूक जराशी, मी पहातच राही प्राची थोडी प्रकाशली.. झाली पहाट हळूवार सारे उजाडले रानं, गुणगुणती पाखरे गाती " या सुखांनो या"हे गीतं...
विषय-  रासलीला लेखिका -सौ.स्वरूपा कुलकर्णी            श्रीकृष्ण परमात्म्याचे संपूर्ण चरित्र म्हणजे अनेक अद्भूत व दिव्य लिलांचा सागर आहे.जितका आपण आतमध्ये शिरकाव करू तितकं खोल आपण जातो व एक नविन अनोखी दुनिया नजरेस येते.जग कृष्णलिलेला  समजू शकत नाही याचं मुख्य कारण हे की जगाची दृष्टी विकार वासनांनी बरबटलेली आहे तर जगदीश्वर कृष्णाची लिला संपूर्ण विकाररहीत,वासनारहीत कृती आहे.ती समजण्यासाठी आधि मन कृष्णाला संपूर्ण शरणागत हवं.नंदनंदनाची लिला ही दैवी लिला असल्याने ती निष्कलंक आहे.रासलीला ही अशाच दैवी लिलांपैकी एक आहे.यात गोपी व कृष्ण यांच्यातील दिव्य अशरीरी प्रेमभावनेने युक्त लिलांचे वर्णन आहे.मुळात गोपिका म्हणजे कुणी सर्वसामान्य गवळणी नसून वेदांतील ऋचाच आहेत.ज्या अत्यंत भावभक्तिने कृष्णाला शरण आलेल्या आहेत.वेदांमध्यही परमात्म्याच्या स्तुती गाणार्या ऋचा आहेत.पुर्वजन्मीचे सिद्ध,योगी,पुण्यात्मे यांची मनोकामना पुर्ण करण्यासाठीच भगवंताने या अवतारात गोपिकांचा कान्हा बनण्याची लिला केली.         पुराणात  असे वर्णन आहे की एकदा गोपिकांनी ...
 दहिहंडीचा थरार लेखक- सौ.स्वरूपा कुलकर्णी           श्रीकृष्णाविषयी थोडेसे-             आपलं सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे श्रीकृष्ण भगवान...या सृष्टिचा रचयिता,स्वामी! प्रेमाची रसमयी मुर्ती...संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत आणि चैतन्यही...या भूमंडळात कृष्णाचं प्रागट्य श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला झालं...या नंदनंदनाने मथूरेत जन्म घेतला व गोकुळात त्याने अनेक लीला केल्या..अनेक राक्षसांचा वध केला व धरणीमाता राक्षसमुक्त केली..कृष्णाचे अनेक खेळ,त्याच्या अगाध लीला,त्याने राधा व गोपीकांसोबत केलेला रास ही सगळी आनंदाची पर्वणीच होती...आजही कृष्ण व राधा रास खेळतात अशी वृंदावनात मान्यता आहे..राधाकृष्ण म्हणजे अद्वैताचं प्रतिक..भक्तिच्या उदात्त अवस्थेचं प्रतिक...गोकुळात रमणारा मुरलीधर कृष्ण म्हणजे समस्त गोप गोपिकांचे स्फुर्तिस्थान..त्यांचे दैवत..कान्हा बालपणी गोकुळात मित्रमंडळींना घेऊन गोपिकांची मटकी फोडायचा..दही-दुध-लोणी गट्टम करण्यासाठी सार्यांचा खोडकरपणा गोपिकांना जेरीस आणायचा.ती माखनचोरी करून कान्हाने प्रत्येक भारतीयाच्या मनाची चित्तचोरीच ...
 हुरहूर  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी     "आई, राहिल न हो आर्या शाळेत, रडणार नाही न जास्त" असे सकाळपासून दहादा सासूबाईंना बोलले असेन..पण आज मनाने मी फार बैचेन होते..सगळं कळत असुनही दाटून आलेली काळजी बिलकूल लपवू शकत नव्हते..सतत डोळे घड्याळाकडे लागलेले..         हो,आज तिचा शाळेचा पहिला दिवस...संपूर्ण सुट्ट्याभर तिला "शाळेत जायचंय बरं का आर्या आता ,शहाण्या मुलीसारखं वागायचं,हट्ट करायचे नाहीत " असे उपदेशाचे डोस पुरवत होते..तिच्या नव्हे पण माझ्याच मनाला वाटलेली भिती तिला कळू न देता जणू स्वतःलाच दर दिवसाला समजावत होते...हो ,आर्या आता मोठी झालीये,आता शाळेत जाणार..बघता बघता दुपट्यातली माझी  आर्या आता  शाळेत जाणार,डब्बा खाणार, कविता म्हणनार,बाईंचे व शाळेचे कौतूक सांगणार ..किती नी काय कालच्या दिवसापर्यंत हेच विचार मनात घोळत  होते..         आज आर्याचा पहिला दिवस तसेच ओवीचाही लॉकडाऊननंतर पहिलाच दिवस शाळेचा...किती धांदल उडाली माझी...सगळ्या सुट्ट्यात अनेक रेसिपी पाहून ठेवल्या होत्या...रेसिपींचे पुस्तक पण घेतलं कारण काय तर दोघींना डब...
विषय - आठवणीतील राखी पौर्णिमा     -सौ.स्वरूपा कुलकर्णी           सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती     ओवाळीते भाऊराया रे,वेड्या बहिणीची वेडी ही माया खरंच बहिणींसाठी आजच्या सारखा खास दिवस नाही.भावाबहिणीच्या प्रेमळ व तितक्याच खट्टा मिठा नात्याला भावनांचे,आपुलकीचे रंग देणारा हा सण..माझा भाऊ किती कर्तुत्ववान आहे हे सांगतांना बहिणीचा उर भरून येतो.तीचा भाऊ मोठा असो की छोटा पण कायम तिची पाठराखण करत असतो..        माझा भाऊ आज मुंबई सारख्या शहरात एचडीएफसी बैंकेत नोकरीला आहे ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.माझ्या आठवणीत रहाणारी राखी पौर्णिमा आहे माझं लग्न झाल्यावरची पहिली राखीपौर्णिमा.....माझा भाऊ वयाने माझ्यापेक्षा लहान आहे पण कौतुकाची गोष्ट ही की तो कायम मोठ्या भावासारखा कायम पाठीशी असतो.अनेक प्रसंगात मदतीला धाऊन येतो.माझं लग्न झालं त्यानंतर पहिल्या राखीपौर्णिमेला माझा भाऊ(त्याला मी भैय्या म्हणते)तो सकाळी घरी आला..आदल्यादिवसापासूनच त्याला भेटायची उत्सुकता होती. त्यावेळी तो मुंबईला इंडसइंड बैंकेत नोकरीला होता..त्यामुळे भेटीची ओढ...
  कविता - स्वातंत्र्याचे पर्व कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी जय जय भारत, जय जय हिंदूस्थान, आम्हा सार्थ तूझा अभिमान, आम्हा सार्थ तूझा अभिमान... सौभाग्यवती  माता भारती, लेकुरे सारी तिची प्रतापी, उखडून ढोंग दुष्टांचे ते, करीती शत्रू निष्प्रभ झणी... सैतानाचे उडवूनी मस्तक, केले नामोहरम शत्रूस सारे, उखडूनी बाहू धडावेगळे, भूमंडळ हादरे कंपाने ते... तोडूनी ही पारतंत्र्याची शृंखला, पेटवूनी स्वातंत्र्याचा वन्ही, उजळले भाग्य ह्या धरेचे, संपले बंध वेदनांचे ते... दिशा वाजवी नगारे स्फुर्तीचे, विजय पाहण्या देवही आले, पराक्रमाने रण हे जिंकले, स्वर्गच वाटे अवनीवर हे.. गुलामगिरीचे क्रौर्य संपूनी, स्वातंत्र्याचा झेंडा रोवूनी, धरती अंबर नाचू लागले, पराक्रम हा अतिबलदायी... संपवून सारी पिडा जनाची, लढले हुतात्मे प्राणपणाने, धरा प्रिय ही जीवीताहूनही, नको पारतंत्र्य पुन्हा कधिही... जय जय भारत, जय जय हिंदूस्थान, आम्ह सार्थ तूझा अभिमान, आम्हा सार्थ तूझा अभिमान...

जन्माष्टमी

  -सौ.स्वरूपा कुलकर्णी घनगर्द श्रावण मासी जन्मला यमुनेच्या काठी घेऊन स्वचैतन्य अवघे मिसळला जनमाणसाशी किती कौतूक या धरेला जन्म देवकीनंदनाचा जाहली तृप्त पिऊनी संतत श्रावणधारा असे हा सोहळा आनंदाचा स्वर्ग उतरला अवनीवरी हा जग हे सजले सगळे अवघे अष्टमीची ही पावन रजनी बरसती सुमन हे अंबरी अन् देवी देवता दाटी झाली कृष्ण जन्मलाहो माझा मथूरेच्या कारागारी वसुदेव निघाले गोकूळी  बाळ रूदन ते विसरूनी घालती टोकरीत बाळं यमुना अडवी वाटेवरती... पदस्पर्श झाला हरीचा अन् यमुना ओसरली हलकेचं चालले वसुदेव घाईने थाटातं निघाले भगवानं.. श्रावण कोंदला चराचरी पाहण्या बाळा आर्त सारी लेवूनी सौंदर्य विश्वाचे हे बाळकृष्ण हा हसतो गाली.. भवभयबंधन संपविण्या हे घेई देव अवतार असाही गोकूळ मथूरा पावन झाली मनीमानसी कृतार्थ सारी जग उद्धाराया हरीने हा घेतला अवतार रामकृष्णांचा संतमंडळी गाती नाचती जय जय रामकृष्ण हरी

श्रावणमेघ

 ... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी घननीळा श्रावणमेघ करी तृप्त तनमनास शहारतो तप्त ह्रदयास न उरले भान क्षणास... ती अवचित नक्षी मेघातं प्रकाशते घनांत अवचितं पाहते खेळ हा रोजं ती श्रावणसंध्या निवांतं.. घन गर्जुन येती क्षणातं काळोख दाटतो मिट्ट मी बावरून पहात राही संध्येचा रंग घनगर्द... कोसळती श्रावणधारा संतत अवनीवरती दिशा धूंदही दाही कृष्णमेघ पांघरती... धरती श्यामला अवघी तृप्त पिऊनी धारा झाला सोहळा सुखाचा मी चिंब लपेटून शेला....
विषय : संध्याकाळ कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी उघडून पंखा रंगांचा, संध्या येई अवकाशी, पक्षी परतती कोटरात अन् गाई जाती गोठ्याशी... सुर्य बुडाला डोंगरी अन् रंग सांडले पाण्यावरती, निळा सावळा काठ दिसे मज, संध्याराणी सुकूमारी... रंगबावर्या कळ्या उमलती, मुक्त खुळ्या फांद्यांवरती, अल्लड साज तो नक्षत्रांचा, मनमोहक भासे एकांती.. हळूच विळखा संध्येचा हा, सभोवार मग दाटून येतो, मुक्तपणे मी हळवा एकटा, रिक्त तिच्या ओंजळीत होतो...
कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी       मुखवटे... बदलतो मुखवटे असे क्षणोक्षणी, रंगबदलू या दुनियेची रितीच तशी मी फक्त माझा ,नाही कुणाचा मला काय आस्था जगाची ती.. माझे बदलती रंग आणि राग, बदलती मुखवटे तसे तसे... मी आत आहे तसा अगदी साधासुधा जगापुढे मात्र उभा मुखवटा धरूनी... असा माझा रंग बदले क्षणोक्षणी सगळ्यात असुनही मी उरलो एकटा...
विषय-  नागपंचमीच्या आठवणी दिनांक- ०२/०८/२०२२  लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी                                          नागपंचमीच्या आठवणी           श्रावणातला आम्हा स्त्रियांचा अत्यंत आवडता सण म्हणजे नागपंचमी. उंचच उंच झोके खेळणे,हातावर भरगच्च मेंदी काढणे,माहेरी जाणे, नविन कपडे घेणे,नागाची दूध लाह्या दाखवून पूजा करणे सगळी मजाच मजा..ही मजा दिवसेंदिवस कमी होत चाललेली दिसतिये पण आमच्या लहानपणी फार मजा यायची.         माझं माहेर औरंगाबाद.लहानपणी नागपंचमीच्या पूजेचं एक विलक्षण गुढ व कौतूक बालमनाला वाटायचं."आई, नाग व साप तर विषारी असतात नं गं.मग त्यांची पूजा का करायची?" असे प्रश्न विचारले की ती म्हणायची, "अगं , नागोबा हा आम्हा स्त्रीयांचा भाऊच,तो जर पूजला तर दंश करत नाही.त्याची कृपा आपल्यावर रहाते".मला ते उत्तर तसं पटलेलं नसायचं पण मनाची समजूत घालून झोके खेळायला जायचे.आज ती मतं पटतात कारण भारतीय स्त्रीच्या उदात्त भावना त्यातून दिसतात.विषार...

गीता अध्याय ५

  -सौ स्वरूपा कुलकर्णी     या अध्यायाचे नाव कर्मसंन्यासयोग अर्थात सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे किंवा कृष्णभावनेने कर्मरत असणे.इथे गीतेचे मुख्य सुत्रच सापडल्यासारखे मला  वाटले.अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो,हे भगवन्, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि पुन्हा भक्तियुक्त कर्माची प्रशंसा करता हे कसे?तेंव्हा भगवंत अर्जुनाला भक्तियुक्त कर्म किती महत्वाचे व कसे साध्य करायचे ते सविस्तर सांगतात. कर्माचा संन्यास व भक्तियुक्त कर्म हे एकाचवेळी भगवंत सांगतात त्याचा अर्थ जे कर्म भगवंताप्रित्यर्थ घडते ते कर्म नसुन भक्तीयुक्त कर्म आहे जे भगवंताला अतिव प्रिय आहे.भक्तिमध्ये युक्त असणारा तत्काळ ब्रम्हाची प्राप्ती करतो असे भगवंत सांगतात.संतांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ज्याने आपले मन भगवंतालाच वाहून टाकले त्याला वेगळा मोक्षच नाही तो स्वतःच भगवतमय झाला म्हणजेच बाह्यरूपात नाही तर अंतरंगातून तो व भगवंत एकरूपच असतात.हीच भक्ति व हाच मोक्ष आहे असे सर्व संत सांगतात.भक्ताची बाह्य परिस्थिती जरी वेगळी असली म्हणजे तो खातपीत असेल,बोलत असेल,काहीही करतांना दिसत असेल तरी प्रत्यक्ष...

आत्मशोधन...

            ✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी     जग ही ईश्वरनिर्मित कलाकृती आहे हे डोळस नजरेने पाहिल्यावर सहज लक्षात येते.ईश्वराने माणसाला देह दिला, मन दिले व बुद्धीही दिली.या जगात आलेला प्रत्येक जीव चांगलं जगण्यासाठी प्रयत्नशील असतो.माणूस कायम समुहात रहाणेच पसंत करतो.त्याला जगतांना सापडत नाही तो आनंद.जो शोधण्यासाठी त्याची अखंड धडपड असते.हा आनंद सर्वत्र भरलेला आहे याची त्याला जाणिवच नसते.तो अहोरात्र आनंदाच्या शोधात व्यर्थ शिणत असतो.मुख्य गोष्ट ही असते की तो जगात येऊन समोरच्या प्रत्येक गोष्टीला ती जशी आहे तशी न पाहता स्वतःला भासेल तसा तिचा अर्थ लावत जातो.तिथेच तो फसतो.कारण समोरची गोष्ट मुळातच वेगळी असल्याने त्याला सत्य दिसू शकत नाही.ईश्वर सर्व स्थितीत सर्व काळात आपल्या आत व बाहेर उपस्थित असतो.गरज असते आपला दृष्टीकोन बदलण्याची.तो आनंदस्वरूप परमात्मा सर्वांचा असल्याने त्याला शोधणे तसे अवघड नाही.गरज आहे ती सत्यशोधनाची.तो सर्वत्र आहेच पण तुम्ही डोळ्यांवर झापड लावून बसलात तर त्याचे दर्शन कसे होणार?जसे दिवसा सुर्य सर्वत्र प्रकाश देतो पण तुम्ही खिडक्या दरवाजे बंद ...

प्रेमकविता

  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी प्रेमाचा तुझा रंग कसा ? लाले लाल,गुलाबी की गर्द हिरवा? मत्त मयुरी,फिकट पोपटी  की सावळा घननीळा... प्रेमा तुझा गंध कसा? परिमळ प्राजक्ताचा की फाया अत्तराचा? घमघमणार्या मोगर्याचा की गंध केवड्याचा... मला भासे दरवळ चंदनाचा !! प्रेमा तुझी फुले कोणती? सुगंधी गुलाब की गजरा जाईचा? चाफ्याचा की मोगर्याचा मला वाटे हा तुळस मंजिरीचा!! प्रेमा तुझे संगित कोणते? तबला पेटी की स्वर संतुरीचा? सनईचा की विणेचा? मला वाटे हा वेळूच्या वेणूचा!!  प्रेमाची ही दुनिया न्यारी निसर्ग मानव एकत्वाची, राधेच्या समर्पणाची, कृष्णाच्या अमुर्ततेची...

जीवनाची कविता...

  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी जन्म मृत्यू मध्ये वाहते, जीवनाची ही अखंड सरिता, नकळे कशी वळणे घेते  थांबत नाही कधी एकदा... जन्म होतो मायबापाच्या घरी बालपण सरते खेळ खेळून सारी, मन रमते आईच्या कुशीत अवघे, उडून जाती दिनं पाखरू जसे... मग येतो तारूण्याचा बहर, मन हे गुंतते मयुरपंखी स्वप्नी, अवचित येतो सण प्रितीचा तेंव्हा, हरवते मन बावरे पुन्हा पुन्हा... पुढे पुढे सरतो आहे , कालचक्र हा पूर्ण विरागी, प्रौढत्वाची फिरे सावली, मन मात्र रेंगाळे तारूण्याशी... काळ सांगतो पुढल्या हाका, आता उरलो थोडाथोडका, नको रे घालवू मला असा तू ईश्वरच अपुला असे सोबती... नकळत दान पडे वृद्धत्वाचे, किती राबलो संसारासंगे, आता जाणवे सगळे खोटे उरले चिंतन स्वस्वरूपाचे... ईश्वर साक्षी खराच अपुला, कळले उशीरा जरी शेवटी, मृगजळ हे नश्वर जीवन, संपते मृत्युच्या बहुपाशी...
 वाट खडतर तरीही मी सक्षम...    ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी               स्त्रीचा जन्म हा कधी साधासुधा नसतोच!कारण ती जन्मतःच सहनशील, संवेदनशील,पुरूषाच्या तुलनेत नाजूक,सुंदर म्हणूनच जन्माला येते.ती निसर्गतःच फुलासारखी कोमल असते.मनाने समजुतदार अशी ती घरातही भावंडांना आधार असते.तिचा घरभर वावर म्हणजे जणू चैतन्याचा अनुभव असतो.किती किती स्वप्न उराशी बाळगुन ती शिक्षण घेते.पण बर्याचदा लग्न करायचं म्हणून शिक्षण थांबवलं जातं किंवा तिला मनासारखं शिकता येत नाही.लग्न या गोष्टीसाठी करिअरला तिलांजली द्यावी लागते.ती घरातली परिस्थिती पाहून स्वतःची स्वप्न गुंडाळून ठेवते.लहान भावंडांसाठी ती स्वतःच्या आकांक्षांना मागेच ठेवते.तिचं ह्रदय शेवटी मातेचच ती लग्नाच्या आधी व एका पुरूषाची बायको झाल्यानंतरही स्वतःच्या  मनाला मूरड घालून संसार करत रहाते.मुलबाळ झाल्यावर एक आई म्हणून अनेक बाबतीत त्याग,समर्पण करतच रहाते.आता तर काय समाजही तिच्याकडून गृहकर्तव्यदक्ष असण्याची अपेक्षा ठेवून असतो.भलेही त्यात तिच्या स्वातंत्र्यावर,मोकळेपणावर बंधन येतात तरी ती सुखी संसाराची स्वप्...

चाहूल

 चाहूल ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी                      दरवर्षी ऋतुचक्र त्याच्या त्याच्या गतीने फिरत असते...सहज विचार केला अरे, जर हे ऋतुरंग दिसलेच नसते तर माणसाचं आयुष्य किती एकसुरी नी बेरंग झालं असतं...तोचतोचपणाने आयुष्य बेसूर झालं असतं...आयुष्यात असणारी ऊन -सावली ,थंडी ,पाऊस हे सगळं असणं किती सुखदायी आहे..ऊन आहे म्हणून सावलीला महत्व ...एकमेकांच्या अस्तित्वामुळे माणसाचं आयुष्य म्हणजे सप्तरंगी इंद्रधन्युष्यासारखं मनमोहक झालंय..ऊन्हाची काहीली सहन करतांना परत पावसाळा येणार याची चाहूल सुखावून टाकते..त्या प्रतिक्षेतही एक वेगळाच आनंद लपलेला असतो...कडकडून भूक लागल्यावर मिळणारे जेवण नुसते उदरभरण करत नाही तर समाधानाची तृप्ती मनास देऊन जाते..सुख नुसतं आयतं समोर येऊन चालत नाही,त्यासाठी दुःखाचे चटके आधी बसावे लागतात...आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर हे खरंय..कडक ऊन्हनंतरची सावली शरीरासोबत मनही शांत करते...दुःखाची झळ आधी लागणे महत्वाचे..आधी दुःखाची काहीली झाली की हळूहळू लागणार्या सुखाच्या चाहुलीने मनुष्य भावनांनी चिंब होतो..थोडा नम्र होतो.....