Posts

Showing posts from September, 2023
 आठवणी  सुखदुःखांच्या.. -सौ. स्वरूपा कुलकर्णी    आठवणी ह्या कधी कधी फार चिवट असतात.मनाच्या कुपीत घट्ट घट्ट रूतून बसतात नी आपल्या परवानगीशिवाय मनावर अधिराज्य गाजवतात.मन त्यामुळे अस्वस्थ सैरभैर होतं.टचकन् डोळ्यात पाणी येतं.काहूर करणारे वादळ वाहू लागतात.मनाची नौका त्या वादळात आधार शोधू लागते.तो आधार त्याला नेहमीच मिळतो असेही नाही.. मिळाला तर एखादी कलाच मदतीला धावत येते..संगीत, नृत्य, नाट्य,  चित्र, लेखन, गायन...कितीतरी..कला हाच बऱ्याचदा आधार होतो.बैचेन मन आपल्या कलेला साद घालते.तेंव्हा त्यातुन नवनिर्मिती होते.या आठवणी कडू गोड कशाही असल्या तरी जेंव्हा कलेतून मनाला आधार शोधला जातो तेंव्हा कलेच्या प्रांगणात अनेक चमत्कार होतात.       आठवणींनी मनात घरोबा केला की पावसाळा नसतांनाही मन पावसात भिजतं, थंडी नसतांनाही हुडहूडतं... किंवा उन्हाळा नसतांनाही चटका बसावा अशी अवस्था होते.मनाला आठवणींचा विरंगूळा कधीकधी हवासा वाटतो.पण नकोशा आठवणी मात्र अजूनच कठोर परिक्षा पहातात.दुःखद आठवणींपेक्षाही नकोशा स्मृती अजूनच अस्वस्थ करतात.मनुष्य कायम या विरहाच्या किंवा मृत व्यक्त...