Posts

Showing posts from February, 2025
 पाखरू  सौ.स्वरूपा कुलकर्णी उन्हाच्या काहिलीत पानंही हलेना उष्ण झळ्या त्या जीवा सोसवेना अशा गरम दुपारी कुठूनसे अवचितं निळे पाखरू आले अंगणी नकळतं मनी हर्षले किती सुंदर रंग त्याचे कुठून आले भर दुपारी अंगणी ते.. शोधित पाणी नजर त्या जीवाची गेली अवचित अंगणात बादलीशी क्षणार्धात झेपावली काया त्याची आकंठ प्यायला जल तृप्ती त्या तृषेची मग करूनीया किलबीलाट स्वतःशी हिरवी पाने हसली पाखरा पाहुनी तहानलेल्या जीवा मिळाला दिलासा पाहुनी मोगरा झाला सुगंधी केव्हडा  तशातच आला जवळूनी स्वर माझ्या खांद्यावरी बसुनी गायला पक्षी वेडा निळ्या चोचीतुनी गायला सुखाने धन्यवाद दिले मला जणू पाखराने
 हळदी-कुंकू ©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी       मकर संक्रमण उत्सव म्हणजे गोड गोड तिळ-गुळ खाण्याचा व लुटण्याचा सण! लहानग्यांनी पतंग उडवण्याचा सण तर आम्हा बायकांसाठी तर निव्वळ आनंद सोहळाच जणू! चांगला महिनाभर चालणाऱ्या ह्या सणात हळदी- कुंकवाचे आमंत्रणं स्विकारणे व घरीही मैत्रिणींना बोलावून हास्य फवारे उडवणे हा जणू परिपाठच! हिची साडी कशी, तिची साडी कशी, हिचे ब्लाऊज कोणी शिवले ते हिचा मेक अप लई भारी पर्यंत नानाविध चर्चांना ऊत येतो. बायकाच त्या ऐकणार का कोणाचं?.छोट्या गावांमध्ये हळदी कुंकवाची  वेगळीच मजा असते. बायका मनमुराद हास्स्यकल्लोळात वाण लुटतात व आपल्या सौभाग्यासाठी रोज नवनविन शृंगार लेऊन सजतात. किती हौशीने रोज नव्या घरी आमंत्रणं स्विकारत आपल्या मैत्रिणीचे कौतूक, तिची सजावट बघायला जातात. जगणं खरंच किती तिळ- गुळासारखं गोड आहे हे हसत खिदळत स्विकारतात. नाव घे , नाव घे करत मैत्रिणीला चिमटे काढतात. माझा नवरा किती प्रेमळ आहे हे सांगण्याची लाजरी खूण म्हणजे उखाणा ! सण सौभाग्याचा पण घरात नवरा नको अशी काहितरी विचीत्र अवस्था होते पहा आम्हा बायकांची. अहो का म्हणून काय विचारता ...
 प्रेमाच्या गावा जावे.. ©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी     मनाच्या बंगल्यात अनेक अडगळीच्या खोल्या असतात. काही सुंदर, निटनेटक्या, आवरलेल्या तर काही अस्वच्छ, गलिच्छ, घाणेरड्या. व्यक्तिपरत्वे त्या जागा वेगवेगळ्या रंग रूपाने नटलेल्या. मनातल्या जागांची खासियत ही की डोळ्याने पाहिलेले, ग्रहण केलेले तसेच पंचेंद्रीयांनी अनुभवलेले भावविश्व फार सखोल टिपत रहाते. स्मृतींच्या रंगीत कपाटात बंद होते. स्वच्छ, सुंदर , पवित्र असं सापडलं की माणसाची अनुभूती सुखद होते. तेच वाईट आठवांनी मन दुःखीही होते. रंगबिरंगी आठवणींच्या खोल्या बालपण,तारूण्य, प्रौढावस्था अशा मानवी जीवनाच्या टप्प्यांचा कोलाज सांभाळत पुढे पुढे जात रहाते. पण काही स्मृती इतक्या जबरदस्त गोंदलेल्या असतात की मन त्या आठवणी समोर आल्या की तिथेच थांबून जाते. काही केल्या पुढे जात नाही. जणू त्यावेळी काळ थांबून जातो.       प्रेम, द्वेष, राग, अपमान, मोह, हत्या, अपघात अशा काही गोष्टींचा मनावर विलक्षण परिणाम होत रहातो. त्या जखमा विसरता विसरत नाही. जगण्याचे कितीही टप्पे पुढे गेले तरी मन तिथेच घोटाळत रहाते. का होते असे?मानसशास्त...