Posts

Showing posts from July, 2022

गुरूमहिमा

✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी        गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरः। गुरूःसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।        अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज महाराज अशा परमआदरणीय सद्गुरूंना आजच्या गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर कोटी कोटी प्रणाम!               माझ्या अल्पमतीने सद्गुरूंविषयी समर्थ काय सांगतात ते लिहिण्याचा प्रयत्न करते.समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सद्गुरूस्तवन समासात सद्गुरूमहिमा वर्णन केला आहे.त्यात समर्थ म्हणतात की सद्गुरूंचे अंतिम लक्ष्य शिष्याला आपल्यासारखेच बनवणे हे आहे.म्हणजेच सद्गुरू शिष्याला स्वतःइतके सक्षम बनवून सोडतात.अशी कृपा खरोखर या संपूर्ण ब्रम्हांडात कोणीही करू शकत नाही.ही किती थोर कृपा आहे की ज्यामुळे शिष्य सद्गुरूंसारखच सद्गुरूपद प्राप्त करू शकतो.उदार अंतःकरणाच्या या परमेशाचे वर्णन करायला समर्थ सांगतात की मी अपुर्ण आहे.या मायेच्या आधाराने मी सद्गुरूमहिमान वर्णन करू शकत नाही,कारण पृथ्वी जवळ क्षमा व आधाराचा गुण आहे.परंतू तिची उपमा सद्गुरूंना लागू होत नाही कारण सृष्टीच्या अंतकाळ...

स्याही और कलम

 सौ.स्वरूपा कुलकर्णी स्याही ने कलमसे कहाँ एक बार, अगर मैं न रहूँ तो क्या हो तूम? कलमने कहा,हाँ हू तो एक कलम  लेकिन बस एक श्याम राधा के बिना...  पत्तेने कहाँ पेडसे, अगर मैं न हूँ तो क्या हो तूम? पेड ने कहाँ हाँ हूँ तो एक पेड  लेकिन एक जिवन साँस के बिना... मानवने कहाँ खुदासे, अगर मै नही तो तू कौन है, खुदा मुस्कूराकर बोले मै और तूम अलग कहाँ?

एक वेगळा दिवस

 ह्या विषयावर खूप विचार केला नी मनातल्या बंद कुपितून एक मोरपीस बाहेर पडावं तशी एक सुंदर आठवण बाहेर पडली.म्हणलं तुम्हालाही हे मोरपीस द्यावं ..या माध्यमातून ते तुम्हाला सहजस्पर्श करून जाईल व क्षणभर आपणही तिथेच जाऊन आलो असा भास होईल...आठवण आहे माझ्या तरूण वयातली..मी B.sc.च्या पहिल्या वर्षाला होते तेंव्हाती..अचानक एक दिवस हैद्राबाद,तिरूपती असा दक्षिण भारतात फिरण्याचा योग आला.माझे (आईचे वडिल)आजोबा म्हणजे सतत फिरण्याची हौस असलेलं व्यक्तिमत्व...त्यांच्या हास्य क्लबने ही सहल आयोजित केली होती..नाही हो करता करता ५५ जणांची बस ठरली.माझी आजी व मावशी पण येणार होते..मलाही फिरण्याची हौस असल्यामुळे  ही सुवर्णसंधीच वाटली व घरूनही सहज परवानगी मिळाली...मग काय जय्यत तयारी झाली...सहलीचा पुरेपूर आनंद अनुभवत आमची सहल हैद्राबादमध्ये चारमिनार, नेहरू झुऑलोजिकल गार्डन,मुझियम,रामोजी फिल्म सिटी,बिर्ला टेंपल असे सगळे अनोखे,सुंदर,प्रशस्त स्थानं पहात होती.. पहातांना मंडळी जणू घरच विसरून गेली. या सगळ्या ठिकाणांबद्दलचे अनुभव लिहायचे झाले तर एक पुस्तक तयार होईल इतकी भारी ती सहल झाली..        ...
                स्त्रीचा जन्म हा कधी साधासुधा नसतोच!कारण ती जन्मतःच सहनशील, संवेदनशील,पुरूषाच्या तुलनेत नाजूक,सुंदर म्हणूनच जन्माला येते.ती निसर्गतःच फुलासारखी कोमल असते.मनाने समजुतदार अशी ती घरातही भावंडांना आधार असते.तिचा घरभर वावर म्हणजे जणू चैतन्याचा अनुभव असतो.किती किती स्वप्न उराशी बाळगुन ती शिक्षण घेते.पण बर्याचदा लग्न करायचं म्हणून शिक्षण थांबवलं जातं किंवा तिला मनासारखं शिकता येत नाही.लग्न या गोष्टीसाठी करिअरला तिलांजली द्यावी लागते.ती घरातली परिस्थिती पाहून स्वतःची स्वप्न गुंडाळून ठेवते.लहान भावंडांसाठी ती स्वतःच्या आकांक्षांना मागेच ठेवते.तिचं ह्रदय शेवटी मातेचच ती लग्नाच्या आधी व एका पुरूषाची बायको झाल्यानंतरही स्वतःच्या  मनाला मूरड घालून संसार करत रहाते.मुलबाळ झाल्यावर एक आई म्हणून अनेक बाबतीत त्याग,समर्पण करतच रहाते.आता तर काय समाजही तिच्याकडून गृहकर्तव्यदक्ष असण्याची अपेक्षा ठेवून असतो.भलेही त्यात तिच्या स्वातंत्र्यावर,मोकळेपणावर बंधन येतात तरी ती सुखी संसाराची स्वप्ने रेखत जाते.खरंच काय मिळवते ती स्वतःची स्वप्न मारून?दुसर्यासा...
 "सद्गुरू"        ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमुर्तीं।  द्वंद्वातातीतम् गगनसद्रुशम् तत्वमस्यादिलक्षम्।  एकम् नित्यम् विमलमचलं । सर्वधिसाक्षीभूतम्।  भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरू तं नमामी।।                  या अशाश्वत, अथांग, सतत बदलणार्या जगात मनुष्य सतत त्याच्या ध्येयाकडे आकृष्ट होत असतो... कळत - नकळत.. त्याची मुक्तीची ,मोक्षाची धाव सतत चालुच असते.. पण गंमत पहा आपल्याला याची किती कल्पना असते..? जगाच्या चित्र विचित्र महानाट्यात आपण एक बाहूलीच असतो... नाचवणारा असतो तो ईश्वर... तो बाहुल्यांचे खेळ खेळतो नी आपणही त्यात अगदी तन्मयतेने रंगून जातो... त्यात किती, कसे फसले जातो, किंवा किती विकारांचा गुंता करून बसतो ते तोच जाणे.. बघा परमात्मा सगळे खेळ खेळतो पण या सगळ्यात एक अद्रृश्य शक्ती तुमच्या पाठीशी सतत असते, जी तुम्हाला या खेळात कधीही हरू देत नाही.. ती शक्ती म्हणजे सद्गुरू...           सद्गुरू हे एक विलक्षण तत्व आहे.. ती कोणी व्यक्ती नाही हे आपण समज...
 कृष्ण        ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी               सगळ्या देवदेवतांमध्ये वेगळी छाप सोडणारा देव म्हणजे कृष्ण.. कन्हैय्या, गोपाळ, नंदनंदन... खरंच किती नावं नी किती रंगीबेरंगी आयुष्य लाभलेला हा देव... कृष्ण म्हणजे रंगवैभवी मोरपीस, कृष्ण म्हणजे घननीळ मेघश्याम, कृष्ण म्हणजे राधेचा श्वास, कृष्ण म्हणजे गोपाळांचा मेळा, कृष्ण म्हणजे यशोदेचा कान्हा... किती लिहावं नी किती वर्णावं त्याचं व्यक्तीत्व.. असा हा अवर्णनीय परमेश्वरी अवतार सर्व मानवजातीचा नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचा लाडका देव आहे.. कृष्णाची रसमयी, निळी सावळी , नटखट मूर्ती बघणार्या प्रत्येकाला वेड लावते.. तो आहे सगळ्यांचा पण "नाही" सगळ्यांचा... त्याला सर्वात राहूनही कोणाचच नसण्याचा एक विलक्षण खेळ खेळता येतो.. आत्तापर्यंत माझा वाटलेला कान्हा बघता बघता माझा नाहीच मुळी अशा वेगळ्याच जगात नेतो.. म्हणजे मी त्याचा अनन्य भक्त म्हणवणारेही त्याला नीट समजू शकले नाहीत.. तसा तो सहज समजून येणारा देवच नाही... एकटी राधाच काय ते समजो जाणे त्याचं अफाट कर्तुत्व... तो निःसंशय अचाट, अफाट आहे.. ...
 स्त्री...  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी        मी स्वतःला एक स्त्रीवादी लेखिका आहे असं काही मानत नाही कारण पुरूषही त्याच्याजागी काहीवेळा बरोबर असतो. ते मान्य करायलाच हवं. खरं म्हणजे स्त्री व पुरुष एका नाण्याच्या दोन बाजू. स्त्री एक परिपूर्ण व्यक्ती आहेच हा माझा ठाम विश्वास आहे परंतू समाजात वावरतांना स्त्री पुरूषाच्या कवचातच सुरक्षित होते. तो अन् ती खूप वेळा एकमेकांच्या परस्पर स्नेहासाठी आसुसलेले असतात. ते नैसर्गिक आहे .शारीरिक दृष्ट्या पुरूष व स्त्री यात भेद आहेत, तसेच स्त्री मनाची घडणही वेगळीच असते हेही खरे. समाजात स्त्री लहानपणापासून वेगळी घडत जाते. तीच्यावर होणारे संस्कार वेगळे असतात. ती स्त्री आहे म्हणजे कमी आहे असा ग्रह समाजात होत असतो परंतू तसे नसून पुरुषापेक्षा वेगळ्या नैसर्गिक प्रक्रियांसाठी तिची निवड झालीये म्हणून ती शारीरिकदृष्ट्या नाजूक तरीही सहनशील असते.डिलिव्हरीच्या कळा सोसणारी ती किती सहनशील आहे हे सांगायलाच नको. निसर्गाने तिला आई बनवलं, ही बहुमुल्य देणगी दिली. त्याचं कारणंच ती हळूवारपणे, कोमल स्पर्शाने बाळाचे लालनपालन करू शकेल. ती हे करतांना वत्स...
 परिमळ...  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  आपण लहानपणापासून कितीतरी गंधांच्या सहवासातून मोठे होत असतो... जन्म होतो तेंव्हापासून ते मृत्युशय्येपर्यंत वेगवेगळे गंध आपलं जगणं व्यापून असतात.. तुम्ही कधी जन्मलेल्या बाळाला जवळ घेतलंय? त्या बाळाला ज्या दुपट्यात गुंडाळलेले असते त्याचा वास, तसेच त्या अख्ख्या खोलीचा वास मनात घर करून जातो... त्या वासाचा परिमळ मनभर पसरतो व काहींना खूप छान वाटतं तर काहींची नकारात्मक प्रतिक्रिया येते... त्या सव्वा महिन्यात बाळंतपणात घरात ओव्याच्या धुरीचा वास, शेक शेगडीचा वास मनाच्या आत खोलवर रूतून बसतो.. नंतर पूर्ण वर्षभर त्या बाळाचा वेगवेगळ्या तेलांच्या मालिशने, साबणांमुळे वेगळाच वास दरवळत रहातो.. मी माझ्या डिलिव्हरी नंतर हे सगळे वास खूप सहज स्विकारू शकले thanks to God ....याचं कारण काहीजणांना याचा त्रास होऊ शकतो... मी पहिल्यांदा ओवीला जन्म झाल्यावर पाहिलं तेंव्हा ती फार काही रडली नाही उलट टूकूटूकू सिस्टरकडे पहात होती.. तिचं दुपटं मी आजही सांभाळून ठेवलंय.. तीच्या सगळ्या कपड्यांना जो वास होता तो मनाला तिचा स्पर्श देऊन जायचा.. ती दुसऱ्या खोलीत गेली तरी माझ्या ...
 प्रेम....   ईश्वराचं दुसरं नाव...राधेचं कृष्णावर, तुलसीचं रामावर, संतांचं पांडूरंगावर...प्रेम हे एक शाश्वत चिरंतन सत्य....अखिल विश्वाला एकसंध ठेवणारं तत्व...प्रेमाची व्याख्याच करायची झाली तर जिथं तुझं ते तुझंच आणि माझं तेही तुझचं...गम्मत ना   प्रेमाच्या व्याख्येत मी गळून जातो फक्त तू रहातो... म्हणजेच समोरचा महत्त्वाचा...माझ्यापेक्षाही..हा प्रेमाचा निस्सिम, निसंदेह असलेला आविष्कार सार्या विश्वाचाच हुंकार आहे... विश्व हा मायेचा अर्थात परमेश्वराच्या शक्तीचाच एक भाग आहे...नीट विचार केला तर लक्षात येईल की या जगात कोण कोण एकमेकांवर प्रेम करतं... कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेमगीत वाचलं तर लक्षात येईल ही आपल्या सार्यांची लाडकी वसुधा सुर्यावर निस्सिम प्रेम करते, अहो म्हणूनच तर दिवस रात्र त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत असते...जणू प्रेमाच्या आणाभाका घेत स्वतःही उन्हाळे पावसाळे अनुभवत बहरत जाते नी त्या तेजस्वी रवीभास्कराची मनधरणी करत रहाते... चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह तोही या वसुंधरेच्या प्रेमात पडून तीची मनधरणी करतोय...पण आपली वसुधा मात्र सुर्याचेच प्रेमगीत गातेय युगानुयुगे... ...
 ☀️    श्री राम    ☀️   आपल्या हिंदू धर्मात राम आणि कृष्ण ही मुख्य २ दैवतं इतर देवतांपेक्षा खूप वेगळे आहेत. सर्वगुणसंपन्न अशी त्यांची ओळख आपल्याला आहे.मनुष्यावतार म्हणूनही व देवता म्हणूनही ते कायमच शूरवीर, बुद्धिमान, अष्टावधानी, चतुर असेच आहेत.त्यात श्री रामाची ओळख आपलं आवडतं दैवत अशीच होते. कृष्णही आवडताच पण राम मनुष्याच्या आदर्शांना जपणारा म्हणून प्रिय..       निळं सावळं रूप, कमळासारखे नेत्र, कटीवर पितांबर धारण केलेला, गालावर रक्तिमा पसरलेला नी सस्मित वदनाचा राम पाहीला की खर्या भक्ताचे लोचन पाणावतात... भक्तांसाठी कायम अभय असलेला, सकलगुणमंडीत श्री राम सतत ध्यावा, गावा, पहावा, आठवावा,  त्याचा कधीही विसर न पडावा हीच  तळमळ भक्ताच्या ह्रदयी असाते...रामाची कथा वाचल्यानंतर त्याने मानलेली उच्च जीवनमूल्ये आपण सर्वांनी स्वताःत आणन्याचा प्रयत्न करावा...त्याने केलेला असिम त्याग, गुरूजनांची सेवा, बंधूप्रेम, पत्नीशी एकनिष्ठता, सेवकासाठीचे प्रेम हे सगळं आदर्शच. एका महान तपस्वी राजाची घनघोर संघर्षाची कहाणी जी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे ती केवळ वं...
 प्रेम... (इथे मी व्यापक विचार केलाय)  या जगातील सर्वात सुंदर अन् सर्वत्र उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे प्रेम... या नश्वर संसारात तोच काय तो खरा शाश्वत आधार आहे .प्रेम ही नुसती भावना नाही तर ते परमेश्वराचच अस्तित्व आहे. विचार करा लहानपणापासून ते आजवर तुम्ही कधीही नुसत्या वस्तूंनी खूश नाही झालात, जसं आई बाबा आपल्यावर प्रेम करायचे मग त्यांनी आणलेलं छोटंसं चॉकलेट, आजोबांची मिशीदार पप्पी व खाऊ, आजीची प्रेमळ थाप व गुळ शेंगदाणे, खरंच या सगळ्यात कुठेही मोठ्ठ असं काहीच नाही सगळं सर्वसामान्यच पण त्यातलं प्रेमचं आजही लहानपण आठवून देत.. घड्याळाचे काटे भरभर फिरतात, कैक दिवस, महिने पळतायेत पण लक्षात काय रहातं? मनाला भावणारे प्रसंगच ना? मग मन जर प्रेमासाठीच तहानलय जर ते त्यातच सुखीये तर आपण का दूर जातोय एकमेकांपासून? जवळ असूनही दोन ध्रूवांचं अंतर आलय आपल्यात..  जरा लहानपणी च्या जगात डोकवा, आपल्या लहानपणी प्रेम स्वस्त व वस्तू महाग होती आज वस्तू स्वस्त पण प्रेम महागलय.. खरं तर जे सर्वत्र आहे, ज्याला अनुभवण्याचीच खरी गरज आहे, जो ईश्वर असण्याचा खरा पुरावा आहे तो आपण का नाकारतोय? मित्र मित्रात...
 मैत्री👩   आपल्या लहानपणी शाळेत जाण्याचा पहिला दिवस आठवा... 😁😁... जवळ जवळ सगळ्यांनीच रडत रडत काढलेला दिवस... 'आई तू बस नं माझ्याजवळ' म्हणून केलेला हट्ट... आता आठवलं तरी हसू येतं पण तेंव्हा ते केव्हडं भलं मोठं संकट वाटलं .. आईपासून दूर या रंगीबेरंगी, अनोळखी दुनियेत कसं रहायला शिकायचं याचं दडपण प्रत्येकाला होतं... असे दुःखाचे दिवस काढतांना😄😄एक दिवस कोणीतरी स्वतः हून आपली ओळख सांगतं, कोणीतरी आपल्यासारखंच या रंगीत दुनियेत मार्ग शोधत असतं... आपल्याला भलतंच भावतं(कारण, एव्हड्या अनोळखी किलबिलाटात स्वतः हून पुढे आलेला तो हात मग घट्ट मैत्रीचा होतो) ती आपली पहिली मैत्री कट्टी दोस्तीची, खाऊ खाण्याची, लपाछपी खेळण्याची तशी गरजेनी निर्माण झालेली तरीही हवीहवीश, आश्वासक.....आई जवळ नसली तरी मन रमवणारी... शाळेत येण्याची ओढ जपणारी... (नाहीतर खरं सांगा, दोस्त नसते तर शाळेत कुणी पाऊल तरी ठेवलं असतं का😃) असेहे फुलपाखरू वय मग आजुबाजूचा अंदाजा घेत मोठं होतरहातं, आपल्या आवडी निवडी, परिस्थिती, अभ्यास यानुसार आसपासची मंडळी बदलत रहातात, पण मैत्री मात्र थोड्याच जणांशी किंवा जणींशी होते... आपल्या विश...
 🌷🌸🌺राम🌺🌸🌷 भेटी लागी जिवा, लागलिसे आस।      मानवाच्या जन्माला जेव्हा आपण येतो तेव्हा जग आपल्याला सर्वस्वी अनोळखी असतं. पण हळूहळू सहवासाने हे जग आपलं वाटायला लागतं. आपली आई आपले वडील ही ओळख आपल्याला होते. आजुबाजूचे वातावरण आपलेसे होते. पण आपण कोण कोठून आलो  कूठे चाललोय याची उत्तरे आपल्याकडे नसतात. आयुष्य आहे म्हणून ते जगायचं याला तसा काहीच अर्थ नाही. मी कोण, कोठून आलो कुठे जायचय ही उत्तरे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या पृथ्वीवर येण्याचं कारण कळणार नाही. यासाठीच एक सच्चा मार्गदर्शक आपल्यासोबत असणे गरजेचे असते. त्यालाच सद्गुरु म्हणतात. जो हा अनोळखी भवसागर तरून जाण्यासाठी उत्तम नावाडी असतो. थोड्या विचारांती कळेल की सद्गुरु आपल्याला कुठे घेऊन जाणार? तर तो त्या परब्रह्म परमेश्वराकडे नेणार. जे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. अध्यात्माचा हा मूळ गाभा आहे की जेथे जीव शिव मिलन होते तेच आपले खरे घर तेच ते परमधाम.      त्या रामाला, सतचिदानंद परमेश्वराला भेटायचे झाल्यास भक्ती ह्रदयात असणे, ही पहिली अट... कारण खर्या तहानेशिवाय पाणी मिळून उपयोग नसतो. यासाठी चा...
 🌸🌷🌺श्री गीता जयंती🌺🌷🌸        एखाद्या धर्मग्रंथाची जयंती साजरी व्हावी हे नवलच म्हणावे लागेल पण गीता ही स्वतः परमेश्वराच्या मुखातून ,जशी गंगा शंकराच्या जटेतूून पृथ्वीवर अवतरली तशीच प्रगटली. त्या गीतेच्या मधूर प्रवाहात अख्खी मानवजात कृतार्थ झाली. गंगा ही शरीर पवित्र करेल पण गीता मनही शुद्ध करेल ती मोक्ष देणारी भगवती व हरीप्रिया आहे. मनुष्यातील मनुष्यत्व जागवून त्याला देवत्वाकडे नेणारी ती परमपावनी माता आहे.मानवी मनावर सुसंस्कार करणारी ती गीता परमेश्वराची मानवाला मिळालेली देणगी आहे.        गीता आपल्याला काय सांगते? पहिलं सांगते ते कर्मयोग, कर्म करत रहा पण त्याचे फळ भगवंताच्या आधिन आहे त्यामुळे तू व्यर्थ आशा ठेवू नकोस. या शिकवणीतून नैराश्य आपल्यापासून दूर राहिल. कारण बरेच जण अपेक्षित यश नाही मिळाले की निराश होतात. भगवान सांगतात उठ आधि तूझे कर्तव्य कर, लढ मी सोबत आहेच. गीता आपल्याला ज्ञानही देते. ते ज्ञान ज्यातुन आपल्याला आपण देह नसुन आत्मा आहोत व आपण कधिही मरण पावत नाही. आत्मा नित्य आहे व अविनाशी आहे. गीता भगवंताच्या विराट स्वरूपाची ओळख करून...
 🌸🌷जय श्री राम🌸🌷  🌸 मनुष्याचं दैवत - राम🌸  या पृथ्वीवर येऊन मानवाला किती वर्षे झाली याचा थांग कदाचित विज्ञान लावेल पण सर्वसामान्यपणे करोडो किंवा अगणित वर्षे ़झाली असतिल जेंव्हा पहिला मानव अस्तित्वात आला. धार्मिक ग्रंथातही हा उहापोह आहेच. पण खरंच मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर त्याचे येथे येण्याचे प्रयोजन काय किंवा तो मुळात कोण आहे हे फार कमी जणांना उमगले. राम किंवा कृष्ण यांच्या अवताराचे मुख्य प्रयोजनच हे होते की माणसातील माणूस जागा करणे. त्याला त्याच्या माणुसपणाची, जबाबदारीची जाणिव करून देणे. रामाचं चरित्र घ्या. राम कायम सत्पथावरच चालला. धर्म, न्याय, निती, चारित्र्य, सत्य, जय या आणि अशा कितीतरी   आयामांचा त्यात विचार केलाय, ज्यात माणसाचं मनुष्यत्व उजळून दिसतं. माणसातील मनुष्यत्वाची ती शक्ती, त्याच्यातील ते तेज रामाने आपल्या धनुष्यबाणांनी सर्वांसमोर आणलं. रामाचा प्रवास किती खडतर, किती बिकट पण ध्येय किती अटळ, मन किती स्थिर. त्याने कुठलीच गोष्ट इतरांवर प्रभाव पडावा, मोठेपणा मिळावा म्हणून केली नाही. तो सदैव उच्च गुणांचा अधिपती होता. कर्म, न्याय,निती, अनुशासन य...
 माझी आठवण🇮🇳    प्रजासत्ताक दिन किंवा स्वतंत्रता दिन असो मनात आठवण ताजी होते ती हटकून शाळेतल्या दिवसांची. आपली शाळा, त्याचा मनात असलेला अभिमान, ती शिस्त, शिक्षकांबद्दलची रास्त भिती व तितकाच आदर, प्रभातफेरीची केलेली तयारी, डम्ब बेल्स, लेझीम, कवायत याची केलेली कस्सून तयारी सारच भरभर डोळ्यासमोर आलं. मन परत तेथेच रूंजी घालू लागलं. शाळेतल्या दिवसांची मजा खरंच काही औरच होती हे प्रकर्षाने जाणवतं. पहाटेची थंडी, कडक ईस्त्रीतील युनिफॉर्म, स्वच्छ धुतलेले सॉक्स, बूट, रिबिनने कच्च आवळलेल्या वेण्या, खरंच तो अनुभवच वेगळा. ती नशाच वेगळी.  देशासाठी बलिदान केलेल्या महात्म्यांची नावे ऐकून, त्यादिवशीच्या राष्ट्रगीताला उठलेला काटा आजही आठवतो. मनात निर्माण होणारे चैतन्य, स्फुर्ती हे त्या दिवसाचे महात्म्य. तो सुट्टीचा दिवस असे न बघता राष्ट्रप्रेम जागराचा दिवस आहे ही भावना टवटवीत होती. त्या दिवशी प्रमुख पाहुण्याकडून ज्यांना बक्षिस मिळायचे त्यांचा रूबाब काही और असायचा. सगळ्यांमध्ये चर्चा व्हायची. तेंव्हा पाय दुखेपर्यंत केलेली कवायत नेहमीच लक्षात राहील.  कार्यक्रमाच्या शेवटी मिळणारा बि...
 हॅलो सखींनो, कशा आहात? जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रीणींना हार्दिक शुभेच्छा एक दिवस आधीच 😀...    आज मी विषय निवडलाय "बदलत्या जगातील  माझा मित्र - स्मार्टफोन! " हा विषय ऐकल्यानंतर कितीतरी जणींना वाटलं असेल कित्ती खरंय आजच्या आधुनिक काळातील नवा मित्र म्हणजे माझा स्मार्टफोन..     मैत्रीणींनो , आजच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक च्या जगात स्टेटस अपडेटेड रहाणं, लाईक, कमेंट नी ़शेअर करणं हे रोज चहा, कॉफी घेण्याइतपत कॉमन झालय, किती अजब गजब तरीही मनोरंजक दुनिया ही, प्रत्येकाला वेड लावते... मोबाईलच्या जगातील ही क्रांती सर्वसामान्य व्यक्तिलाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते. मोबाईलने आपल्या स्त्रीयांच्या विश्वात तर कमालच केलीये. ऑनलाईन शॉपिंग, डीपीवरचे सुंदर सुंदर फोटो, बदलणारे स्टेटस किती नी काय... मुळातच सुंदर असणाऱ्या माझ्या कित्येक मैत्रीणी आता स्वतः ला अधिक  अपडेट ठेवायला लागल्यायेत. बघून खूप मजा येते.. स्त्री ही मुळातच संसाराची आवड असणारी, कलाकार, कधी आई, कधी बहिण, कधी मुलगी कितीतरी नाती जपणारी...पण ही नाती सांभाळलतांना तिला तिचा स्पेस दिला या १ विताच्या स...
 पृथ्वीचे प्रेमगीत-      युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना!  नव्हाळीतले ना ऊमाळे, उसासे न ती आग अंगात आता उरे  विझूनी आता यौवनाच्या मशाली उरी राहीले काजळी कोपरे.  परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे अविश्रांत राहील अन् जागती.  न जाणे न नेणे कुठे चालले मी  कळे तू पूढे आणि मी मागुती मी  दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का-  फुले परंतु तुझ्या मुर्तिवाचून देवा,  मला वाटले विश्व अंधारले.  तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेजःकण मला मोहावया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारूनी दारूण.  पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी याचना प्रीतीची लाजुनी लाल- होऊनिया लाजरा मंगळ.  निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रूव पिसाटापरी केस पिंजारूनी हा  करी धूमकेतू कधी आर्जव.  परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तूझी दूरता त्याहूनी साहवे. तळी जागणारा निखारा उ...
कविता क्रमांक २- कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळू दे तारे!  विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे ढळूदे दिशाकोन सारे!  ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले दडूद्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळुदे पलिता!  की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाला प्रमत्त सैतान जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान!  पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटूदे नभ माथ्यावरती आणि तुटूदे अखंड उल्का वर्षावात अग्नी नाविका ना कुठली भीती!  सहकार्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रापरी असीम नीलामध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम!  काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा आपुला बाणा त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा!  कोट्यवधी जगतात जिवाणू जगती अन् मरती जशी ती गवताची पाती,  नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली  निर्मितो नव क्षितिजे पुढती!  मार्ग आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा घराची वा वितभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात ज...
 कोव्हिड १९ :एक वेगळा अनुभव        ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी   हा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा उद्देश एव्हडाच की परिस्थिती कशिही येवो आपला कस पाहिला जात असतो, पण आपली सकारात्मकता या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढते. झालं असं की १० -१२ दिवसांपुर्वी मी, माझे मिस्टर व सासूबाई आम्ही घर आवरायला घेतलं. २ दिवसांत २ बेडरूम आम्ही आवरल्या व मिस्टरांनी स्वयंपाकघर आवरलं. नंतर संध्याकाळी मला कणकण वाटायला लागली म्हणून मी विक्स अॅक्शन ५०० ची १ गोळी घेतली पण त्यामुळे मला अशक्तपणा वाटू लागला.. मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांनी पॅरासिटॅमॉल दिली ताप कमी जास्त होत होता.. नंतर मी संध्याकाळी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सर्दी तापेच्या गोळ्या दिल्या... मला एव्हाना अशक्तपणा जाणवतच होता... मनात शंका येत होत्या.. त्या रात्री सासूबाई पण तापल्या.. मग सकाळी त्यांना चेक केलं... ब्लड टेस्ट मध्ये सीपीआर जास्त होतं.. रॅपिड टेस्ट करायला सांगितली... रिझल्ट पॉझिटीव्ह.. मग मी व मिस्टरांनी पण टेस्ट करून घेतली मी पॉझिटीव्ह मिस्टर निगेटिव्ह... मनाची तशी तयारी झाली होती... पण माझ्या दोन्ही मुलींचा प्र...
 द लॉकडाऊन ईफेक्ट...  मी  व स्वयंपाकघर...  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील लग्नानंतरचं तिचं पहिलंवहिलं व्यासपीठ..हक्काचं..कारण ती व तिने बनवलेले पदार्थ हे सगळ्या घराला नव्हे नव्हे सगळ्या नातेवाईकांनाच कुतूहलाचा विषय ठरतात...स्त्रीला स्वतः ला सिद्ध करण्याची ती एक अत्यंत जिव्हाळ्याची जागा आहे...गृहीणी असो की नोकरी करणारी स्त्री दोघीही स्वतः बनवलेल्या स्वयंपाकाला जास्त महत्त्व देतात...कारण तिने त्यात स्वतः चा प्राण ओतलेला असतो...मग त्या पदार्थाची चव खाणार्यातच्या जिभेचा ठाव घेते...सुरूवात जरी या क्षेत्रात अडखळत झाली तरी पुढे मात्र "मला माझ्या बायकोने केलेला ढोकळाच आवडतो" किंवा "आईने केलेल्या उसळीची चव कशालाच नाही" ही मुलांची वाक्य तिला सुखावून जातात...      पहिलं लॉकडाऊन म्हटलं तर कठिण नी म्हटलं तर गमतिदार होतं...स्त्रीयांसाठी स्वयंपाकघर व त्यांचा जिवश्च कंठश्च  मोबाईल जरा जास्तच जवळ आले. कारण काय तर सुगरणींना नविन रेसिपींना लाईक्स किती मिळाले व मी स्टेटसवर कशी झळकले हे मिरवण्याचे ते दिवस होते.. त्यात आईला मोकळा वेळ मि...
 माझे माहेर अक्कलकोट      ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी       कोरोना व लॉकडाऊन झाल्यानंतर मला ओढ लागलिये माझ्या माहेरी जाण्याची... तसं माझे माहेर औरंगाबाद परंतु, कोरोनाच्या या संकटकाळात निर्विघ्नपणे बाहेर काढणारे माझे गुरू श्री स्वामी महाराज यांना भेटण्याची ओढ तीव्र आहे... त्यांचं बोलावणं आलं की दर्शन नक्की होणार हा विश्वास आहेच... त्यामुळे या संकटकाळाचे खरे रक्षक तेच व माझे आप्त, स्वकियही तेच... म्हणायला सद्ध्या मी घरात आहे परंतु अक्कलकोट ला जाण्याची ओढ जणू 'जल बिन मछली जैसी' अशी आहे.. काय सांगणार नी किती सांगणार अक्कलकोट हे गुरू भक्तांसाठी काय आहे? ते एक तिर्थक्षेत्र तर आहेच पण माझी स्वामी माऊली जेथे वास्तव्यास होती त्या जागेची त्या स्थानाची महती काय वर्णावी? साक्षात दत्त महाराज तेथे वास्तव्यास होते... निर्गुण निराकार परंतु भक्तांसाठी सगुण साकार झालेले हे तेजस्वी रूप पहाण्यासाठी देवी देवताही खाली येतात.. अक्कलकोट हे स्वामींचे स्वामीभक्तांचे पंढरपूर.. इथे विठूराया आमचा स्वामी महाराज तर संत म्हणजे चोळप्पा, बाळप्पा, स्वामीसुत ही स्वामींची श्रेष्ठ भक्त मंडळी.....
 माझिया मना...     ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी        सर्रकन तिने खिडकीचा पडदा बाजूला केला...आता बेडरूममधला प्रकाश वाढला... मोबाईलवर तिचे आवडते आशाबाईंचे गाणे चालू होते, माझिया मना, जरा थांबना, पाऊली तुझ्या माझिया खूणा.....'     नुकतेच न्हयल्यामुळे ओले झालेले तिचे लांबसडक, काळेभोर केस तिने अलगद समोर घेतले... तीने आरशात बघितले... लग्न झाल्यानंतरचे तिच्यातिल बदल तीला जाणवले...गोरापान सुंदर, टवटवीत चेहरा, सुंदर मोठे डोळे, गुलाबी ओठ,कोणीही प्रेमात पडावं असं गोड हसू...मग तिचं लक्षं गेलं, कपाळावरील थोडीशी मोठी टिकली., सोन्याचे कानातले, गळ्यातलं मंगळसुत्र.. नविनच शिकलेली नी सावरायला थोडी कठीणच वाटणारी साडी, त्याचा सुंदर पदर, नविन लग्न झालेल्या तिच्या चेहर्यावरील नवी नव्हाळी ...ती हे सगळं भान हरपून पहात होती...लग्न झालेल्या सईचं हे नवं रूपडं बघून ती स्वतःशीच हसून लाजली... मनात विचारांची गर्दी झाली...लग्न होऊन एक महिनाच झालेला पण अजय तिला फुलासारखं जपत होता.. सासरही तीला जपणारं होतं.. प्रेमळ, समजुतदार माणसं... मोठं घर, नोकचाकर, घर सुखवस्तूच.. ती तशी ...
 फुलला प्राजक्तं...  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  पहाटेची थंड हवा, आकाशात सुर्योदयाची चाहूल, चंद्र-चांदण्याना निरोप देत सुरू झालेला पक्ष्यांचा किलबिलाट, स्वतःची कोटरं सोडून दानापाण्यासाठी उडणारे त्यांचे थवे... हवेतला गारवा उबदार भासत असतांनाच अचानक मंद सुगंध यावा नी आपली पावलं त्या दिशेने वळावीत... तोच परिचित सुवास...  धूंद,मंद ,मनाला आल्हाद देणारा नाजूक दरवळ...अन् प्रतिक्षा संपते..समोरच दर्शन  होतं त्या नित्य सुगंधी, नाजूक, सुकोमल, सात्विकतेचा परिसस्पर्श लाभलेल्या दैवी लेण्याचं.. अर्थात पारिजातक... प्राजक्त...     पुराणात कथा सांगतात,एकदा समुद्रमंथनात लक्ष्मी, कौस्तुभ,ऐरावत, चंद्र अशी एकामागून एक सुंदर रत्न बाहेर पडत असतांना जे अकरावं रत्न बाहेर पडलं ते होतं पारिजातक वृक्ष... त्यानंरची कथा सांगतात की  सत्यभामेने एकदा हा वृक्ष बघितला नी कृष्णाजवळ हट्टच धरला, 'नाथ, मला हा वृक्ष हवाच' तिच्या हट्टापायी कृष्णाने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध करून हा वृक्ष पृथ्वीवर आणला... आता तो लावला सत्यभामेच्या उद्यानात... इकडे खबर गेली रूक्मिणीच्या कानावर.. मग  क...
 🌷नमस्तेस्तु  भगवती सरस्वती🌷     ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी         या कुन्देन्दुतुषार हार धवला।  या शुभ्र वस्त्रान्विता।  या विणावरदण्डमन्डीतकरा।  या श्वेतपद्मासना।  या ब्रम्हाच्युतशंकरप्रभुतिभि्र देवै सदा वन्दिता।  सा मां पातु सरस्वती भगवती।  निशेष जाड्या पहा।।         शुभ्र वसने धारण केलेली,  चतु्रभूजा असलेली,एका हातात वेद, दुसऱ्या हातात स्फटिकांची माळ ,पुढील दोन्ही हात विणा वाजवण्यासाठी घेतलेले.. पाठीवर सुंदर मऊ केस रूळणारे, चेहर्यावर सुंदर स्मितहास्य, भाळी कुंकवाचा टिळा... अतिशय सुंदर गौर वर्ण देह, शुभ्र कमळावर बसलेली माता भगवती देवी सरस्वती ही वेदांची जननी आहे.. ही वेदमाता शब्दांना, सुरांना, वाणीला प्रसवते.. सरस्वतीचा कृपाप्रसाद असल्याशिवाय वाणी शब्दांना जन्म देऊ शकत नाही... लेखनी शब्दांना उमटवू शकत नाही.. जगाचे शाब्दिक व्यावहारही होऊ शकत नाहीत... नवनवोन्मेशषालिनी बुद्धीही आपले कार्य करू शकत नाही... अशी ही भगवती सरस्वती नित्य भक्तांना अभय देते....          दे...
 ...गुंतता ह्रदय हे!!  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी      लास्ट लेक्चर संपलं.. मानसी व तिच्या मैत्रीणी सरळ कॅंटीनजवळ आल्या ..आज सेमिस्टरचा शेवटचा दिवस, त्यामुळे समोसा पार्टी ठरली होती, तीपण रजनीकडून...ती पार्टी आटोपून  मानसी सटकली, कारण तीला आज घरी बघायला येणार होते..      वा-यावर भूरभूर उडणारे केस .. ५०- ६० च्या स्पीडवर तिची अॅक्टीव्हा रस्त्याची अनेक वळणे मागे टाकत  सेव्हन व्हील्स ला पोहोचली...तिथून एक टर्न मारत तिने घर गाठलं...घर पाहताच आता पुढे काय वाढुन ठेवलय ?असा तिच्या मनात विचार आला..    खरं म्हणजे तीचा लग्न करण्याला विरोध नव्हता पण बिना नोकरीचं लग्न करावं हे तिच्या करीअरिस्टीक मनाला पटत नव्हतं.. ती दिसायला सावळी, सुंदर मोठ्या डोळ्यांची, लांब केस, तुकतुकीत त्वचा, फिगर छानच असलेली , थोडक्यात लग्न नावाच्या बाजारात पसंत असलेली.. ती सावळी होती पण तीच तिची उजवी बाजू होती कारण तिचा चेहरा विलक्षण आकर्षक होता.. सावळी माणसं नाकी, डोळी निटस असल्यावर सुंदर दिसतात... तशीच ती... नावाप्रमाणेच 'मानसी' मन मोहून टाकणारी.. तिचा स्वभावही मनस्वी,...
 प्रोजेक्टची ऐशीतैशी...         ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी   माझं सगळं शिक्षण औरंगाबादला झालं.. मी माझं B. Sc., S. B. College मध्ये केलं...S.B.अर्थात सरस्वती भूवन महाविद्यालय... औरंगाबादमधिल नावाजलेलं कॉलेज नी संस्थाही.. मी थर्ड ईयरला असतांना आम्हाला कम्प्युटर या विषयात प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन याचं जाम टेन्शन असायचं... ओरॅकलमध्ये किंवा कुठल्याही डेटाबेसमध्ये प्रोजेक्ट बनवायचा..  त्यात व्हिज्युअल बेसिक्स ची मदत घ्यायची... प्रोजेक्ट खूप अवघड असायचे... माझा कम्प्युटर हा विषय मनापासून आवडता होता... मार्क्स पण चांगले असायचे..  तेंव्हा मी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होते... प्रेझेंटेशन तर मी अनेकवेळा दिले होते, ते पण सक्सेसफुली डन!!  वर्षभर मेहेनत केली... अभ्यासही मन लावून केला.. परिक्षा जवळ आली.. तसं तसं टेन्शन वाढू लागलं.. आमच्या प्रोजेक्ट चे सुपरव्हिजन चिटणीस सरांकडे होते... जाम भिती होती कारण चुकीला माफीच नव्हती... तो प्रोजेक्ट रन होणं फार फार महत्त्वाचं होतं.. प्रोजेक्ट नुसता असून उपयोग नव्हताच... जर ऐनवेळी कम्प्युटरने किंवा सिस्टीमने लोचा ...
 "गणपती बाप्पा मोरया" ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  वक्रतुंड महाकाय । सुर्यकोटी समप्रभ।  निर्विघ्नं कुरूमे देव।सर्वकार्येषु सर्वदा।।         सर्व कार्यांची सुमंगल सुरूवात गणेशाच्या प्रतिष्ठापनेने होते. या मंगलमूर्तीच्या पुजनाने मन प्रसन्न होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्तांचे लाडके दैवत म्हणजे गणपती. वेदांनी या गणेशाला ओंकाररूपात पाहिले. म्हणजे या जगाची सुरूवातच गणेशापासून होते असे त्यात म्हंटले आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात करतांना  ज्ञानेश्वरांनीही याच मंगलमूर्तीची विनवणी केली आहे.प्रत्येक ग्रंथाची सुरूवात ह्याच मोरयाला स्मरून होते. याचे प्रमुख कारण ही सकल सिद्धींची, कलांची देवता आहे. गजाननाला आधी वंदन म्हणजे १४ विद्या, ६४ कलांना वंदन. या कलांना विद्यांना प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास गजाननाची उपासना अत्यंत मोलाची आहे. हा सकल विद्यांचा, कलांचा स्वामी मनापासून केलेल्या उपासनेला तत्काळ फळ देतो. त्यामुळे तो भक्तप्रिय, भक्तवत्सल देव आहे.       गणेश म्हणजे गणांचा स्वामी, समस्त प्राणीवर्गाचा स्वामी. त्याचेच नाव गजानन, म्हणजे हत्त...
 "व्यक्तीमत्व "    ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी         आपण जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा एक निरागस, आईवर पूर्णपणे अवलंबून असलेला एक सजीव , मांसाचा गोळा असतो. आसपासच्या जगाला आपल्या त्या अवस्थेचे विलक्षण कुतुहल असते.आपण कसे पहातो, कसे हसतो, कसे रडतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. खरंच तेंव्हा  नामकरणही न झालेला तो जीव वेगवेगळ्या नावांनी पुकारला जातो. कोणाचा कान्हा, कोणाचा बबड्या, कोणाचा पिल्लू किती नी काय. सगळे आपलं कौतूक करण्यात, आपलं नाक कसंय, आपले डोळे कसे आहेत हे एकमेकांना सांगण्यात मश्गुल असतात. आपण मात्र या सगळ्या गोष्टींपासून पूर्णतः अनभिज्ञ असतो. तेंव्हा आपल्या डोक्यात विचारही नसतात. मग विचारांचे ओझे ही दूरची गोष्ट. आपण अगदी मुक्तपणे हातपाय हलवत पहुडलेलो असतो. कधी आईची मांडी, कधी बाबांचा खांदा, कधी ताई दादांची मस्ती असे करत करत आपण मोठे होतो. मग हळूहळू हे आसपासचं जग आपल्याला शिकवायला लागतं. जेथे आई बाबांशिवाय जग माहिती नव्हतं तेथे नातेवाईक, मित्र कंपनी यांनी नव्या जगाशी ओळख होते. मग त्यांच्या सहवासात येऊन आपण आपल्या बुद्धीनुसार, आकलनशक्तीनुस...
 पाऊस ...  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  बरसत ये सखया माझ्या उरात ह्या,  दे चिंब जाणिव तृप्तीची मनास या..  दे चिंब शहारे वृक्षवेलिस या, दे आतुर ओढ चातकास या..  दे मृदगंध स्वर्गिचा श्वासास या,  मी क्षण क्षण विसरले जगास या..  दाह प्रीतीचा विझवू दे विरहणीस या,  मी भूलले तन मन धन तव स्पर्शात या...  विपूल शतधारांची तव मूर्त मनोहारी,  दे अवचित मयुरभेट दृष्टीस या...  फुलले क्षण, भुलले मन,  तरीही निशःब्द तू प्रितीत या...
 पावसास प्रेमपत्र..  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी प्रिय पावसा,       तुझ्या स्वागताचे दिवस आले. मन परत एकदा प्रसन्न झाले. तुझ्या येण्याने मनाला आलेली मरगळ क्षणात नाहीशी झाली. खरंच किती भावणारा, रोमांचित करणारा तुझा सहवास.तूझे धरतीवर आगमन म्हणजे नवचैतन्याचे आगमन. सणावारांची रेलचेल. मंगळागौरीची गाणी, झाडाला बांधलेले झोके, उपास तापासांचे लगबग, मनाला आल्हाद देणारे तुझे हे सुखसोहळे. धरती तुझ्या धारा पिऊन हरीतवसना होते. तिचे रूप खूलते. धरतीवर नद्या,सरोवरे,धबधबे उत्फुल्लतेने तुडूंब भरतात व वाहू लागतात. जणू ते तुझ्या येण्याच्या उत्सवात आनंदविभोर होतात.     माझ्या लहानपणापासुनचा तू सवंगडी. कागदाची होडी, शाळेत गायलेली तुझी गाणी, रस्त्यांवरून येतांना उडालेली फजिती सगळं मनात कायमसाठी केरलेलं. कॉलेजमध्ये असतांना चिंब भिजत खाल्लेला समोसा, फूरक्या मारत पिलेला चहा,स्कूटी पेपवरून केलेली यथेच्छ सैर.. लग्न झाल्यावर बावरलेली मी पहिल्या पहिल्या श्रावणसणांना किती नटले, मुरडले. पहिल्या डिलिव्हरी नंतर बाळाला सोबत घेऊन अनुभवलेली तुझी खोडकर मस्ती..किती नी काय.. तुझं वैभव अ...
 ये रे सावळ्या विठ्ठला,  भेट देई कडकडूनी,  आसावला जीव देवा,  जन्म सार्थकी लाव वेगी मन रंगले तव नामी,  मी तुझी झाले चक्रपाणी,  न उरले भान देवा,  कोण तू कोण मी...  ज्ञाना, तुका, निवृत्ती,  भक्त गाती आळवूनी,  जनी, बहिणा, मुक्ताबाई,  तरले तव नामस्मरणी...  गजर तुझ्या नामाचा,  भिणला सर्व चराचरी,  करी भजन मी देवा,  उरले न आता काही...
 जागतिक पुरूष दिन ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी   खरं पाहता असाही दिवस साजरा करावा असे बर्याच जणांना रूचणारं नाही,कारण येणारा प्रत्येक दिवस हा या पुरूषी संस्कृतीत त्यांचाच तर असतो असं म्हणनारे सापडतील.पण खरं सांगू आपण चुकतोय, पुरूषांना गृहीत धरतोय.ते आहेत म्हणून स्त्रीयांची आण बाण शान आहे.असं पहा पुरूषांनी स्वताकदीवर इतिहासात,वर्तमानातही अनेक पराक्रम गाजवले,लढाया जिंकल्या. यात स्त्रीयांचही महत्वाचं योगदान आहे ते टाळता येणारच नाहीच,परंतु खरा संघर्ष रणांगणात पुरूषांनीच केला.आपल्या बाहुबळावर ते संघर्ष करत होते व आजही तोंड देतात.तशा संघर्षाच्या जागा बदलल्या.दैनंदीन आयुष्यातही ते तणाव,कामाचा बोजवारा,आर्थिक समस्या, आणखी कितीतरी जबाबदार्यांना तोंड देतात.बर्याचदा बायकोला नकळत त्रास एकट्याने सहन करणातात.          स्त्री ही जात्याच नाजूक,संवेदनशील,शरीराने पुरूषाच्या तुलनेत सुंदर,सुडौल असते. ती नाजूक कामांसाठीच निवडली जाते.ते स्वाभाविकच आहे.घरात बाहेरची कामं पुरूषालाच करावी लागतात.आज स्त्रीही त्यात आघाडीवर आहे ,पण हे मान्यच करावं लागेल की वजन उचलण्याची कामे ज्या सहजतेने...
 गीता अध्याय ५ -सौ स्वरूपा कुलकर्णी     या अध्यायाचे नाव कर्मसंन्यासयोग अर्थात सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे किंवा कृष्णभावनेने कर्मरत असणे.इथे गीतेचे मुख्य सुत्रच सापडल्यासारखे मला  वाटते.अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो,हे भगवन्, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि पुन्हा भक्तियुक्त कर्माची प्रशंसा करता हे कसे?तेंव्हा भगवंत अर्जुनाला भक्तियुक्त कर्म किती महत्वाचे व कसे साध्य करायचे ते सविस्तर सांगतात. कर्माचा संन्यास व भक्तियुक्त कर्म हे एकाचवेळी भगवंत सांगतात त्याचा अर्थ जे कर्म भगवंताप्रित्यर्थ घडते ते कर्म नसुन भक्तीयुक्त कर्म आहे जे भगवंताला अतिव प्रिय आहे.भक्तिमध्ये युक्त असणारा तत्काळ ब्रम्हाची प्राप्ती करतो असे भगवंत सांगतात.संतांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ज्याने आपले मन भगवंतालाच वाहून टाकले त्याला वेगळा मोक्षच नाही तो स्वतःच भगवतमय झाला म्हणजेच बाह्यरूपात नाही तर अंतरंगातून तो व भगवंत एकरूपच असतात.हीच भक्ति व हाच मोक्ष आहे असे सर्व संत सांगतात.भक्ताची बाह्य परिस्थिती जरी वेगळी असली म्हणजे तो खातपीत असेल,बोलत असेल,काहीही करतांना दिसत असेल ...
 श्री उपासनी बाबा व कन्याकुमारी स्थान ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी    माणसाच्या आयुष्यात जे अनुभव दुर्मिळ ,सुंदर,सुखद असतात त्यांना तो पुनःपुन्हा अनुभवण्यासाठी तरसत असतो.माझ्या आयुष्यात साकुरीचे उपासनी बाबा स्थान अशाच काही दुर्मिळ अनुभवांपैकी एक आहे.इथे पहिल्यांदा आलेला माणुस स्थानाच्या प्रेमातच पडतो .खरं सांगायचं तर यात काही विशेष नाही,कारण स्थानात दररोज पाळली जाणारी दिनचर्या,तिथे नेहमी होणारे यज्ञयाग,व्यावस्था,स्वच्छता व टापटीप खरोखरच अवर्णनीय.सद्गुरू उपासनी बाबा व सती गोदावरी माताजी या २ विभुती येथिल कार्याचे अध्वर्यु आहेत.या दोन महान दैवी विभुतीमत्वांनी केलेले कार्य खूप मोठे आहे.भारतभरच नव्हे तर जगभरही त्यांचे साधक पसरलेले आहेत.उपासनी बाबांनी कुमारीकांसाठी कन्याकुमारी स्थानाची निर्मिती केली.इथे कुमारिकांसाठी वेद वेदांतांची ओळख व्हावी म्हणून शिकवण्यास प्रारंभ केला.त्यासाठी पंडितांची व्यावस्था केली.या मुली बाबांनी व माताजींनी निवडून पारखून घेतलेल्या होत्या.त्यामुळे या ईश्वरधिष्ठीत मार्गावर त्या न घाबरता,न कंटाळता चालत राहील्या.जरी हा मार्ग कठोर नियमांचा असला तरी न डगमगता त्या...

गीताजयंती

      ✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी     आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये अनेक गीता आहेत.जसे रामगीता, लक्ष्मण गीता,गणेशगीता,उद्धवगीता वगैरे.परंतु या सर्वांत सर्वाधिक लोकप्रीय नाव आहे ते म्हणजे श्रीमद्भगवतगीता !! खरंच हे नाव इतके लोकप्रिय का?तर ही गीता प्रत्यक्ष भगवंताने रणांगणावर हतबल झालेल्या अर्जुनाला सांगितली म्हणून.आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांना निराशा येणे,हतबल होणे ही काही नविन गोष्ट नाही.त्यामुळे कुरूक्षेत्राच्या रणांगणात मोहग्रस्त,निराश अर्जुनाला पुन्हा लढायला उभं करणारा कृष्ण आपला खरा नायक बनतो.खरंच गीतेचा उपदेश केवळ एकट्या अर्जुनासाठी होता का?तर नाही.अर्जुन त्या प्रत्येक जीवाचं प्रतिनिधित्व करतो जो आयुष्यात चुका करतो,निराश होतो, माघार घेतो, रडतो,मोहग्रस्त होतो.जगणं जेंव्हा थांबल्यासारखं वाटतं तिथे गीतेतला कृष्ण परत कंबर कसुन कामाला लावतो.कृष्ण केवळ शाब्दिक डोस पुरवत नाही तर त्यात जीवनाचे मर्म सांगतो.हे मर्म जीवाला परब्रम्हापर्यंत घेऊन जाते.कृष्ण एकाच गीतात सगळं वेद वेदांत पटवतो,इतकंच नाही तर मनुष्याने कर्म कसे करावे व कसे करू नये हे सुत्रबद्धरित्या समजावतो.गीते...

माझे बाबा

  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी        आपल्या मनात लहानपणापासुन काही नाती किती निशःब्दरित्या एखाद्या गुपिताप्रमाणे लपलेली असतात,जणू त्या नात्यांच अस्तित्व आपलं संपूर्ण जग व्यापूनही परमेश्वरासारखं लक्षातही न येण्यासारखं अदृश्य असतं....माझे बाबा...हो खरंच, या व्यक्तिचं माझ्याबाबतीत अगदी तस्सच नातंय...फार नाजुक,स्नेहार्द,मायेचं,अलवार जपणूक करणारं,फार निरागस ... माझे बाबा माझ्यावर रागावले का कधी?असं आठवण्याचा प्रयत्न केला तर फारच कमी वेळा..कारण मी त्यांची लाडकी रेणुका...पहिली मुलगी,माझ्या आधी एक मुलगा जन्मला नी काही दिवसातच निमोनियाने गेला...त्यामुळे त्याच्यानंतर जन्मलेलं मी पहिलंच अपत्य....मी जन्मल्यानंतर बाबांना सर्वात जास्त आनंद झाला होता असं आई सांगते...मलाही बाबाच आईपेक्षाही जास्त आवडायचे व आजही आवडतात...त्यांचा संपूर्ण स्वभावच "सालस" या एका शब्दात सांगण्यासारखा आहे...त्याबरोबरच हुशार,देवभक्त,प्रेमळ,अतिशय मृदू व शालिन स्वभावाचे माझे बाबा आईचे मनापासुन सर्वकाही ऐकणारे प्रिय जिवनसाथीही आहेत...              मुलगी तशी नकळतच बाबालाच आपला ...

शाश्वत प्रेम

✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी खरं तर प्रेम करायला कुठल्याही एका दिवसाची गरज नाही किंवा प्रेम काही एकच दिवस किंवा आठवडाभर करायची कवायत नाही ती तर जन्मजन्मांतरी अनुभवत रहाण्याची गोष्ट आहे..प्रेम समजायला आपण कधीपासून लागलो? तर आपली सर्वात जवळची  प्रिय व्यक्ती म्हणजे आई,तिचे निष्पाप,निर्व्याज प्रेम,वात्सल्य तिचे तिच्या बाळाप्रती असणारे अतुट नातं , यासाठी एकच नव्हे अनेक जन्मही खर्च झाले तरी उतराई होणार नाही..दुसरं प्रेम करतो तो आपला पिता!वरून वरून कठोर पण आतुन पिकलेल्या रसाळ गर्यासारखा!बाबा म्हणजे लेकिचा सर्वात आवडता व लेकाचा सर्वात जवळचा मित्र!..तिसरी महत्वाची व्यक्ती बहिण किंवा भाऊ ..भांडून भांडून प्रेम करणारे असे जिवलग! सख्खी बहिण आणि प्रेमळ भाऊ..यांच्यासोबतची मजा दुसरं कोणासोबतच येणार नाही...एकमेकांसाठी जीव की प्राण असणारी तसेच वेळ पडली तर मनसोक्त भांडणारी ही मंडळी आंबट गोड लोणच्यासारखी...मैत्रीच्या जवळ जाणारी...यानंतर चौथं प्रेम करतात ती सगळी मित्रमंडळी...दिलखूलास व थट्टामस्करी करणारी...यांच्याशिवाय जगणं अधुरंच...पाचवी महत्वाची व्यक्ती म्हणजे आपला जीवनसाथी...नवरा किंवा बायको..यांचं प्रेम ...